SSC Board Students : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर मृत्यू

तेलंगणा : तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.



तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या श्रीनिधी हिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीनिधी दहावीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली. शाळेतील एका शिक्षकाने श्रीनिधीची तब्येत बिघडल्याचे बघितले. यानंतर श्रीनिधीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. पण तिने प्रतिसाद दिला नाही.


नंतर श्रीनिधीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात तपासणी करुन डॉक्टरांनी श्रीनिधीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने कामारेड्डी परिसर हादरला आहे. दरम्यान दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या

Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन

'आयुष्मान भारत' ८ वर्षानंतर राष्ट्रीय होणार, लवकरच 'या' राज्यांमध्ये 'आयुष्मान भारत' लागू होणार

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला

मोठी बातमी ! कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस

West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी

PM Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक

Viral : मोठ्या भावाची ती मिठी; आणि वाचले धाकट्याचे प्राण

केरळम : कधी सक्खे भाऊ पक्के वैरी असतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवायला कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कोणताही धोका