Central Railway : 'ओपन अ‍ॅक्सेस' मुळे मध्य रेल्वेला ६ हजार ५ कोटींचा फायदा!

  65

रेल्वेला स्वस्त दरात वीज खरेदी करण्याची मिळाली संधी


मुंबई : भारतीय रेल्वेने (Indian Railway) वीज खरेदीत मोठा बदल करून मोठ्या प्रमाणात बचत केली आहे. २०१५ पासून मध्य रेल्वेने ‘ओपन अ‍ॅक्सेस’ प्रणाली स्वीकारून थेट स्वस्त वीज खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या वीज खर्चात तब्बल ६ हजार ५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) हा निर्णय घेणारा पहिला विभाग ठरला असून, मागील १० वर्षांत त्याचा मोठा आर्थिक फायदा दिसून आला आहे.



पूर्वी भारतीय रेल्वे राज्य वीज मंडळे किंवा राज्य वीज वितरण कंपन्या यांच्याकडून वीज खरेदी करीत होती. महाराष्ट्रात या विजेचा दर तब्बल ९ रुपये प्रति युनिट होता. त्यामुळे रेल्वेच्या एकूण खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, मध्य रेल्वेने ‘ओपन अॅक्सेस’मधून वीज खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे ओपन अ‍ॅक्सेस प्रणालीमुळे रेल्वेला थेट वीज निर्मिती कंपन्याकडून किंवा बाजारातून स्वस्त दरात वीज खरेदी करण्याची संधी मिळाल्यामुळे महागड्या पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी झाले आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत शक्य झाली.


मध्य रेल्वेने २०१५ पासून ‘ओपन अ‍ॅक्सेस'मार्फत वीज खरेदी सुरू केली. त्यामुळे आता मध्य रेल्वेला १० वर्षांत रेल्वेच्या वीज खर्चात तब्बल ६ हजार ५ कोटी रुपयांची बचत झाली. ओपन अ‍ॅक्सेसमुळे वीज खरेदीचा दर ९ रुपयांवरून ५.५० ते ६.५० रुपये इतका कमी झाल्याने याचा थेट परिणाम रेल्वेच्या वीजबिलावर झाला. मध्य रेल्वेने वर्ष २०१५–१६ मध्ये रेल्वेने ७९४ दशलक्ष युनिट वीज वापरून १६१ कोटींची बचत केली होती. वर्ष २०१८–१९ मध्ये ही बचत ७१६ कोटी इतकी झाली. तर वर्ष २०२३–२४ मध्ये ती वाढून ७५२ कोटींवर पोहोचली.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना