Yuzvendra Chahal- Dhanashree Verma : 4 वर्षातच काडीमोड! भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. धनश्री-युजवेंद्र या दोघांनी आज मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, धनश्री-युजवेंद्र हे दोघेही घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात उपस्थित होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं. दोघांचंही हे सेशन तब्बल ४५ मिनिटं सुरू होतं. यामध्ये दोघांनीही न्यायाधीशांना सांगितलं की, ते १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघांनी कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावर अखेर न्यायालयानं दोघांच्याही घटस्फोटाला मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.



युजवेंद्रने आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासूनच धनश्रीनं मागितलेल्या पोटगीच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. धनश्री वर्मानं युजवेंद्र चहलकडे तब्बल ६० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं सांगितलं जात होतं.मात्र,घटस्फोटावेळी पोटगीची रक्कम किती ठरली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


दरम्यान, चार वर्षांपूर्वी युजवेंद्र आणि धनश्री वर्मानं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही लव्ह मॅरेज केलं होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेदाच्या बातम्या समोर येत होत्या. पण, तरीसुद्धा या जोडप्यानं याबद्दल कधीही उघडपणे बोललं नाही किंवा चर्चाही केलेली नाही.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण