Yuzvendra Chahal- Dhanashree Verma : 4 वर्षातच काडीमोड! भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. धनश्री-युजवेंद्र या दोघांनी आज मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, धनश्री-युजवेंद्र हे दोघेही घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात उपस्थित होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं. दोघांचंही हे सेशन तब्बल ४५ मिनिटं सुरू होतं. यामध्ये दोघांनीही न्यायाधीशांना सांगितलं की, ते १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघांनी कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावर अखेर न्यायालयानं दोघांच्याही घटस्फोटाला मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.



युजवेंद्रने आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासूनच धनश्रीनं मागितलेल्या पोटगीच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. धनश्री वर्मानं युजवेंद्र चहलकडे तब्बल ६० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं सांगितलं जात होतं.मात्र,घटस्फोटावेळी पोटगीची रक्कम किती ठरली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


दरम्यान, चार वर्षांपूर्वी युजवेंद्र आणि धनश्री वर्मानं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही लव्ह मॅरेज केलं होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेदाच्या बातम्या समोर येत होत्या. पण, तरीसुद्धा या जोडप्यानं याबद्दल कधीही उघडपणे बोललं नाही किंवा चर्चाही केलेली नाही.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख