Yuzvendra Chahal- Dhanashree Verma : 4 वर्षातच काडीमोड! भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. धनश्री-युजवेंद्र या दोघांनी आज मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, धनश्री-युजवेंद्र हे दोघेही घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात उपस्थित होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं. दोघांचंही हे सेशन तब्बल ४५ मिनिटं सुरू होतं. यामध्ये दोघांनीही न्यायाधीशांना सांगितलं की, ते १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघांनी कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावर अखेर न्यायालयानं दोघांच्याही घटस्फोटाला मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.



युजवेंद्रने आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासूनच धनश्रीनं मागितलेल्या पोटगीच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. धनश्री वर्मानं युजवेंद्र चहलकडे तब्बल ६० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं सांगितलं जात होतं.मात्र,घटस्फोटावेळी पोटगीची रक्कम किती ठरली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


दरम्यान, चार वर्षांपूर्वी युजवेंद्र आणि धनश्री वर्मानं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही लव्ह मॅरेज केलं होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेदाच्या बातम्या समोर येत होत्या. पण, तरीसुद्धा या जोडप्यानं याबद्दल कधीही उघडपणे बोललं नाही किंवा चर्चाही केलेली नाही.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून