Manipur Terrorists : मणिपूरमध्ये १७ दहशतवाद्यांना अटक!

इंफाल : मणिपूरमध्ये गेल्या २४ तासांत ४ जिल्ह्यांमधून अनेक बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित १७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती इंफाल पोलिसांनी आज दिली. (Manipur Terrorists)



यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, राज्याच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग कियाम लीकाई भागातून बंदी घातलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुप (केवायकेएल) संघटनेशी संबंधित १३ दहशतवाद्यांना गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २७ जिवंत काडतुसे, ३ वॉकी-टॉकी सेट, कॅमफ्लाज युनिफॉर्म आणि इतर सामरिक वस्तू देखील जप्त करण्यात आल्या, आहेत. त्याचप्रमाणे इंफाल-पूर्व जिल्ह्यातील न्गारियन चिंग भागातून प्रतिबंधीत युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (पी) एका दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


अटकेतील आरोपी खंडणीच्या गुन्ह्यात लिप्त होता. तसेच सुरक्षा दलांनी गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील न्गाईखोंग खुल्लान भागातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (सिटी मेइतेई) च्या एका कार्यकर्त्यांला अटक केली.काकचिंग जिल्ह्यातील काकचिंग सुमक लीकाई भागातून पोलिसांनी खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुपच्या (केवायकेएल) सक्रिय कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी इंफाल- पश्चिम जिल्ह्यातील फिडिंगा येथून केसीपीच्या (पीडब्ल्यूजी) एका कॅडरला देखील अटक केली आहे. (Manipur Terrorists)

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव