दिल्लीत पाच मार्चपासून वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट

मुंबई : दिल्लीत यंदा ५ ते ७ मार्च २०२५ या कालावधीत २४ वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद अर्थात 'वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट' (डब्ल्यूएसडीएस) होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही टदी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्युट' अर्थात 'टेरी'ने या परिषदेचे आयोजन केले आहे. देशाचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव हे यंदाच्या परिषदेची प्रस्तावना करणार आहेत.



ग्लोबल साऊथमध्ये स्थित शाश्वत विकास तसेच पर्यावरणावर आधारित स्वतंत्ररित्या आयोजित केली जाणारी एकमेव परिषद म्हणून डब्ल्यूएसडीएस २०२५ ‘शाश्वत विकासाला वेग तसेच हवामान उपाययोजनांसाठी भागीदारी’ या संकल्पनेभोवती आयोजित केली जाणार आहे. त्यातून जागतिक हवामान आव्हानांचा सामने करून शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला जाईल. एसडीजीच्या पूर्ततेबाबत जग पिछाडीवर आहे आणि उत्सर्जन तात्काळ कमी करण्याची गरज असल्याने ही परिषद कृतीसाठी भागीदारीच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करेल.

टेरीच्या महासंचालक डॉ. विभा धवन म्हणाल्या की, “बदलात्मक हवामान कृतीचा भागीदारी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. डब्ल्यूएसडीएस २०२५ मध्ये आम्ही सीमांपल्याड जाणारे एकत्रित प्रयत्न करून शाश्वत भविष्यासाठी नावीन्यपूर्णतेला व महत्त्वाकांक्षी उपाययोजनांना प्रेरणा देणे यासाठी कार्यरत आहोत. डब्ल्यूएसडीएस २०२५ हे ही भागीदारी जोडून एका प्रभावी बदलाला प्रेरित करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.”

शाश्वत विकास उद्दिष्टे आणि पॅरिस हवामान करारनामा स्वीकारल्यानंतर एक दशकाच्या कालावधीने यंदा या परिषदेचे आयोजन केले जात आहे. प्रारंभीच्या तसेच चर्चासत्रांनंतर या परिषदेत सात सत्रे आयोजित होतील. त्यात शाश्वत वित्तपुरवठा, ऊर्जा संवर्धन, निसर्ग, हवामानाप्रति वचनबद्धता, तग धरण्याची क्षमता, नावीन्यपूर्णता आणि शाश्वत विकासाला केंद्रीभूत करणे या मुद्द्यांचा समावेश असेल. या परिषदेत २४ संकल्पनात्मक घटकही असतील.

डब्ल्यूएसडीएस २०२५ मध्ये जागतिक विचारवंत, धोरणकर्ते, वैज्ञानिक, उद्योगातील तज्ञ तसेच तरूण नेते सहभागी होऊन एसडीजीचा विकास करण्यासाठीच्या संदेशांवर चर्चा करतील. त्यात भागीदारी, चर्चा यांची सीओपी३० च्या दिशेने भारतात आयोजित होणाऱ्या सीओपी३३ पर्यंत जाताना एसडीजीला वेग देण्यासाठी भूमिका अशा मुद्द्यांचा समावेश असेल. तसेच नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्सवर (एनडीसी) महत्त्वाकांक्षांना वेग देणे आणि ग्लोबल साऊथसाठी भारताची आघाडी व विद्यमान हवामान कृती परिस्थितीत जागतिक संवाद स्थापित करणे अशा गोष्टींचा समावेश असेल.

“या परिषदेतून तीन मुद्द्यांवर महत्त्वाकांक्षा आणि कृती केली जाईल: शाश्वत विकासाचा वेग वाढवणे, सीओपी३० साठी महत्त्वाचे संदेश तयार करणे आणि एनडीसी ३.० मध्ये अधिक महत्त्वाकांक्षा तयार करून हवामानाला न्याय देणे,” असे मत डब्ल्यूएसडीएसच्या निर्मात्या आणि टेरीमधील सीनियर फेलो डॉ. शैली केडीया यांनी व्यक्त केले.
Comments
Add Comment

राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी

'Dunagiri' Warship : स्वदेशी ‘स्टेल्थ फ्रिगेट’ तंत्रज्ञानाने बांधणी केलेली ‘दुनागिरी’ युध्दनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालना मुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड

मुंबईत वीज दरात कपात; एप्रिल २०२६ पासून ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पावर आणि अदानी

नवीन आयकर कायदा आणि अनेक अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून होणार लागू

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार

Navnath Ban : मतदारांनी नाकारल्यामुळे संजय राऊत, उबाठा गट नामर्द बनल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या

Maharani Tararani : महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या

आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावा मुंबई : छत्रपती