प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच – योगी आदित्यनाथ

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालावर विधानसभेत खुलासा


लखनऊ: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पाणी प्रदूषित नसून शुद्धच असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. केंद्रीय प्रदूषण मंडाळाने प्रयागराजचे पाणी शुद्ध नसल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलाय. त्यापार्श्वभूमीवर योगींनी विधानसभेत आज, बुधवारी हा खुलासा केला आहे.


यासंदर्भात योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रयागराजमध्ये ड्रेनेज सिस्‍टिम उत्तमरित्‍या काम करत असून सर्व ड्रेनेज पाईपलाईनमधील पाणी पूर्ण शुद्धीकरण करुनच नद्यांमध्ये सोडले जाते. उत्तरप्रदेश प्रदूषण महामंडळ दररोज पाण्याची गुणवत्ता तपासते. संगमाजवळील आजच्या पाण्याचा बायोकेमीकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्‍सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्क्यांपर्यंत आहे.


संगमावरील पाणी केवळ स्‍नानासाठीच नाही तर ‘आचमन‘ घेण्यासाठीही अगदी शुद्ध आहे असा दावा त्‍यांनी केला. त्‍याचबरोबर पाण्यातील मानवी मलमुत्रामुळे कॉलीफॉर्म वाढल्‍याचा दावाही त्‍यांनी फेटाळला. त्‍यांनी सांगितलेकी हे प्रमाण प्रति १०० एमएल पाण्यात २५०० एमपीएनपेक्षा कमीच आहे. राष्‍ट्रीय हरीत लवादानेही महाकुंभवेळी पाण्यातील मानवी मलमुत्राचे प्रमाणही नियमानुसार असून प्रति १०० एमएल मध्ये २००० पेक्षा कमी एमपीएन एवढे आहे असे स्‍पष्‍ट केले आहे. सेंट्रल पोल्‍युशन कंट्रोल बोर्डाने (सीपीसीबी) प्रति १०० एमएल पाण्यात २००० एमपीएन (Most Probable Number )प्रमाणाला काही अपवादात्‍मक वेळा परवानगीयोग्‍य आहे असे म्‍हटले. हे प्रमाण ५०० एमपीएन अगदी योग्‍य आहे.


योगी आदित्‍यनाथ यांनी या गोष्‍टींचा संदर्भ घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाकुंभला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्‍याचा आरोप त्‍यांनी यावेळी केला. काही लोक महाकुंभ मेळा बदनाम करण्यासाठी कॅम्‍पेनिंगच चालवत आहेत असेही ते म्‍हणाले. केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्रयागराजमध्ये ७३ ठिकाणांहून पाण्याचे नमूने गोळा करुन त्‍याची चाचणी केली होती. यासाठी सहा वेगवेगळे निकष लावले होते. पाणि किती आम्‍लयुक्‍त किंवा अल्‍कधर्मीय आहे याची तपासणी करुन हा अहवाल राष्‍ट्रीय हरीत लवादाकडे दाखल केला होता. हरीत लवादापुढे प्रयागराजमधील पाण्यात मलनिसाःरण करु नये अशा मागणीची याचिका दाखल आहे. त्‍यावर सध्या सुनावणी सुरु आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे