SIP : एसआयपी गुंतवणुकीला जानेवारीत धक्का !

मुंबई : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडत आहे. गुंतवणूकदार त्यांची एसआयपी थांबवत आहेत. लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांमधून पैसे काढत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे आणि गुंतवणूक थांबली आहे.



सध्या शेअर बाजारात अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, आत्तापर्यंत लोक कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते. म्युच्युअल फंडात शेअर बाजारापेक्षा कमी जोखीम असते, असेही मानले जाते. पण आजकाल स्मॉल आणि मिड कॅप फंड लाल रंगात असल्यामुळे स्मॉल आणि मिड कॅप फंडांबद्दल गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, एसआयपी स्टॉपपेज रेशोमध्ये वाढ दिसून आली आहे. एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ८२.७३% वाढली आहे. हे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ६१.३३ लाख इतकी होती.
Comments
Add Comment

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती

Vidyavihar Flyover : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत!

मुंबई: मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या 'विद्याविहार उड्डाणपूल' (ROB) प्रकल्पाचे काम