SIP : एसआयपी गुंतवणुकीला जानेवारीत धक्का !

  48

मुंबई : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडत आहे. गुंतवणूकदार त्यांची एसआयपी थांबवत आहेत. लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांमधून पैसे काढत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे आणि गुंतवणूक थांबली आहे.



सध्या शेअर बाजारात अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, आत्तापर्यंत लोक कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते. म्युच्युअल फंडात शेअर बाजारापेक्षा कमी जोखीम असते, असेही मानले जाते. पण आजकाल स्मॉल आणि मिड कॅप फंड लाल रंगात असल्यामुळे स्मॉल आणि मिड कॅप फंडांबद्दल गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, एसआयपी स्टॉपपेज रेशोमध्ये वाढ दिसून आली आहे. एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ८२.७३% वाढली आहे. हे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ६१.३३ लाख इतकी होती.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.