SIP : एसआयपी गुंतवणुकीला जानेवारीत धक्का !

मुंबई : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडत आहे. गुंतवणूकदार त्यांची एसआयपी थांबवत आहेत. लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांमधून पैसे काढत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे आणि गुंतवणूक थांबली आहे.



सध्या शेअर बाजारात अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, आत्तापर्यंत लोक कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते. म्युच्युअल फंडात शेअर बाजारापेक्षा कमी जोखीम असते, असेही मानले जाते. पण आजकाल स्मॉल आणि मिड कॅप फंड लाल रंगात असल्यामुळे स्मॉल आणि मिड कॅप फंडांबद्दल गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, एसआयपी स्टॉपपेज रेशोमध्ये वाढ दिसून आली आहे. एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ८२.७३% वाढली आहे. हे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ६१.३३ लाख इतकी होती.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही