SIP : एसआयपी गुंतवणुकीला जानेवारीत धक्का !

मुंबई : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडत आहे. गुंतवणूकदार त्यांची एसआयपी थांबवत आहेत. लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांमधून पैसे काढत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे आणि गुंतवणूक थांबली आहे.



सध्या शेअर बाजारात अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, आत्तापर्यंत लोक कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते. म्युच्युअल फंडात शेअर बाजारापेक्षा कमी जोखीम असते, असेही मानले जाते. पण आजकाल स्मॉल आणि मिड कॅप फंड लाल रंगात असल्यामुळे स्मॉल आणि मिड कॅप फंडांबद्दल गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, एसआयपी स्टॉपपेज रेशोमध्ये वाढ दिसून आली आहे. एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ८२.७३% वाढली आहे. हे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या ६१.३३ लाख इतकी होती.
Comments
Add Comment

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर