छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान मोदींचे अभिवादन

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट (ट्वीट) केली. या पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.





'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.

त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.' या शब्दात पोस्ट करुन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.



महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. आज बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या घटनेला आज ३९५ वर्षे पूर्ण झाली. एकाचवेळी मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, निजाम आणि इंग्रज अशा अनेक शत्रुंची आव्हाने पेलणारे आणि स्वतःचे आरमार स्थापन करुन भल्या भल्यांना आव्हान देणारे राजे ही छत्रपती शिवरायांची ओळख आहे. भारतीय नौदलाचे जनक आणि गनिमी कावा अर्थात कमांडो कारवायांचे तंत्र विकसित करणारे राजे अशीही शिवाजी महाराजांची ओळख सांगितली जाते.





Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.