PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

कराची : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला ६० धावांनी हरवले. या एका पराभवामुळे यजमान पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.


कराची नॅशनल स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात किवी संघाने पहिल्यांदा खेळताना ३२० धावांचा स्कोर केला होता. याला उत्तर देताना पाकिस्तानचा संघ पुरता थकला आणि त्यांचा डाव २६० धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये आता भारत आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत.


या सामन्यात कर्णधार मोहम्मद रिझवानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच भारी पडला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने ३२० धावा केल्या. न्यूझीलंडचे फलंदाज विल यंग आणि टॉम लाथम यांनी शतकी खेळी केली. विल यंगने १०७ धावा तडकावल्या तर टॉमने ११८ धावांची तडाखेबंद खेळी केली. या दोघांच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडला ३२० धावांचा स्कोर उभा करता आला.


पाकिस्तानचा संघ फलंदाजी करताना सुरूवातीपासूनच संथ वाटला. त्यांच्याकडून बाबर आझमने ६४ धावांची खेळी केली. मात्र त्यासाठी त्याला ९० बॉल खर्च करावे लागले. तर खुशदिल शहाने ६९ धावा केल्या. सलमान अघाने ४२ धावांची खेळी केली. मात्र हे तीनही फलंदाज संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय