इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी ५० सेलिब्रिटींना समन्स

मुंबई : इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप शमलेला नाही. नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.



आई वडिलांविषयी यू ट्युबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले आणि पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले. मागील काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया गायब आहे. त्याच्या मुंबईतील घराला कुलुप आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला देश सोडण्यास बंदी घातली आहे. याच प्रकरणात राज्याच्या सायबर सेलने ५० सेलिब्रेटींना समन्स बजावले आहे. पोलिसांनी समन्स बजावलेल्यांपैकी पाच जणांचा जबाब नोंदवला आहे.महाराष्ट्र सायबर सेल सध्या इंडियाज गॉट लेटेंटच्या सर्व भागांची तपासणी करत आहे. यू ट्युबवरील कार्यक्रमासाठी पैसा नेमका कोणत्या मार्गाने येत होता आणि कसा वापरला जात होता, याचाही पोलिस तपास करत आहेत.
Comments
Add Comment

उद्योगवाढीसाठी राज्यात परवाने प्रक्रिया झाली सुलभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ३३ पैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर आणण्यात यश मुंबई : महाराष्ट्रात उद्योग

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; दिल्ली-एनसीआरला मिळाले दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार

नवी दिल्ली : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवर

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

मुंबईत ३४० झाडांचा गुदमरलेला श्वास झाला मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी ‘ट्रॅश बूम’

मुंबई : ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या

नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ