सावधान, असा होत आहे कुरिअर स्कॅम !

मुंबई : फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन अर्थात फेडएक्स या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. काही जण फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आणि तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आहेत; असे सांगतात.या दाव्याला जे बळी पडतात त्यांची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्याशी गाठ घालून दिली जाते, जे कायदेशीर कार्यवाहीची किंवा डिजिटल अटकेची धमकी देतात आणि तो त्रास टाळण्यासाठी तत्काळ पैशांची मागणी करतात. एकदा पैसे हस्तांतरित केल्यानंतर हे घोटाळेबाज गायब होतात आणि फसवणुकीला बळी पडलेल्यांचे आर्थिक नुकसान होते.



लक्षात ठेवा, फेडएक्स कोणत्याही अनाहूत ईमेल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे तुमच्या खात्याची किंवा ओळखीसंबंधी व्यक्तिगत माहिती मागत नाही. तसेच फेडएक्स कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित नाही आणि त्यांच्या वतीने कार्यवाही देखील करत नाही. कुरिअर सेवांचे प्रतिनिधित्व करण्याचे नाटक करणाऱ्यांपासून किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध रहा. धमकी किंवा संदिग्ध विनंतीला प्रतिसाद देताना पैसे हस्तांतरित करू नका. अशा एखाद्या फसवणुकीला बळी पडल्यास १९३० वर कॉल करून किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार नोंदवून माहिती द्या; असे आवाहन फेडएक्सने केले आहे.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून