Nitesh Rane : शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा..! राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे मंत्री नितेश राणे आक्रमक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या (Shivjayanti 2025) दिवशी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. यामुळे राहुल गांधी वादात अडकले आहेत. त्यांनी केलेले हे ट्वीट चर्चेत असताना शिवप्रेमींसह राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना माफी मागण्याचे आव्व्हान केले आहे. अन्यथा पुढे त्यांना शिवप्रेमींच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.



 राहुल गांधी यासारख्या औरंग्याच्या पिल्लावळाकडून दुसरी काहीच अपेक्षा नाही. हे हिरवे साप औरंग्याच्या विचारावर आणि देशावर राजकारण करतात. यामुळे त्यांना नेहमी शिवरायांच्या स्वराज्याचा द्वेशच असतो. जगभरात छत्रपती शिवरायांचा आदर करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्रयाच राज्याच्या जयंतीला स्वत:ला देशाचे मोठे नेते समजणारे लोक श्रद्धांजलीचा उल्लेख करतात. महापुरुषाबाबत असे वक्त्व्य सहन केले जाणार नाही. त्यामुळे राहुल गांधीने देशातील सर्व शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. जर हे नाही केलं तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्याला इथे किती वेळ येऊ देतात ते पाहणं गरजेचं असेल, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.



यांना घाणेरडं राजकारण करता येत


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये २०२३च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. याबाबत विरोधकांकडून टीका होत आहेत. यावरही नितेश राणे यांनी घणाघात केला आहे. 'महायुतीचे सरकार शिवरायांचा पुतळा आणि स्मारक बनवण्याचा प्रवासावर छोट्या छोट्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो. घडलेली घटना निस्तारण्यासाठी आम्ही इथेच आहोत. इतरांसारखं केवळ फोटो काढण्यासाठी जात नाही. त्यावेळी फोटोसेशन करण्यासाठी पेंग्विनसारखे इतर प्राणी प्राणीसंग्रहालयातून बाहेर आले होते. अशा लोकांना मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहावंस वाटत नाही की, तुम्ही अशा पद्धतीने स्मारक उभं करताय याची माहिती काय आहे? या लोकांना केवळ घाणेरडं राजकारण करता येत, इतर काही नाही, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

Parali Crime News : परळी हादरली! मित्राची चक्क दगडाने ठेचून हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह ठेवून आत्महत्येचा रचला बनाव

बीड : परळी परिसरात पैशांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात

Pune Toxic Liquor Case : पुणे विषारी दारू प्रकरणात CIDची मोठी कारवाई; रसायन पुरवठादार पिता-पुत्र जेरबंद

पुणे : दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात (Pune Toxic Liquor Case) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मोठी

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

LOAN WAIVER : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा!

MAHARASHTRA : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'

Car Accident : धक्कादायक! १५ वर्षाच्या मुलाने भरधाव कारने ९ जणांना उडवलं, ५ गंभीर जखमी

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण