Nitesh Rane : शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा..! राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे मंत्री नितेश राणे आक्रमक

Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या (Shivjayanti 2025) दिवशी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. यामुळे राहुल गांधी वादात अडकले आहेत. त्यांनी केलेले हे ट्वीट चर्चेत असताना शिवप्रेमींसह राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना माफी मागण्याचे आव्व्हान केले आहे. अन्यथा पुढे त्यांना शिवप्रेमींच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

 राहुल गांधी यासारख्या औरंग्याच्या पिल्लावळाकडून दुसरी काहीच अपेक्षा नाही. हे हिरवे साप औरंग्याच्या विचारावर आणि देशावर राजकारण करतात. यामुळे त्यांना नेहमी शिवरायांच्या स्वराज्याचा द्वेशच असतो. जगभरात छत्रपती शिवरायांचा आदर करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्रयाच राज्याच्या जयंतीला स्वत:ला देशाचे मोठे नेते समजणारे लोक श्रद्धांजलीचा उल्लेख करतात. महापुरुषाबाबत असे वक्त्व्य सहन केले जाणार नाही. त्यामुळे राहुल गांधीने देशातील सर्व शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. जर हे नाही केलं तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्याला इथे किती वेळ येऊ देतात ते पाहणं गरजेचं असेल, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

यांना घाणेरडं राजकारण करता येत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये २०२३च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. याबाबत विरोधकांकडून टीका होत आहेत. यावरही नितेश राणे यांनी घणाघात केला आहे. ‘महायुतीचे सरकार शिवरायांचा पुतळा आणि स्मारक बनवण्याचा प्रवासावर छोट्या छोट्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो. घडलेली घटना निस्तारण्यासाठी आम्ही इथेच आहोत. इतरांसारखं केवळ फोटो काढण्यासाठी जात नाही. त्यावेळी फोटोसेशन करण्यासाठी पेंग्विनसारखे इतर प्राणी प्राणीसंग्रहालयातून बाहेर आले होते. अशा लोकांना मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहावंस वाटत नाही की, तुम्ही अशा पद्धतीने स्मारक उभं करताय याची माहिती काय आहे? या लोकांना केवळ घाणेरडं राजकारण करता येत, इतर काही नाही, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

5 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago