Ayodhya : राम मंदिरावरून उडणारे ड्रोन पाडले

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर संकुलात गर्दीतून उडणारे ड्रोन पाडण्यात आले आहे. अयोध्येत सोमवारी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी संध्याकाळी गेट क्रमांक ३ वर ड्रोन उडत पोहोचला. त्यावेळी ड्रोनविरोधी यंत्रणेने ड्रोन पाडला. यानंतर सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले. बॉम्ब स्क्वॉड टीमला पाचारण करण्यात आले. ड्रोनची तपासणी करण्यात आली. ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.


अयोध्या पोलिसांना संशय आहे की हे चेंगराचेंगरी घडवण्याचे कट असू शकतो. कारण, राम मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास मनाई आहे. मंदिरावरून विमानांनाही उड्डाण करण्याची परवानगी नाही.अयोध्येतील कटरा चौकीचे प्रभारी सुनील कुमार यांनी रामजन्मभूमी पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. सदर एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता, राम मंदिर परिसरातील ड्युटी पॉइंट, बॅचिंग प्लांटजवळ, प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन कॅमेरा उडवताना काही अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून तो टाकला. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहता ड्रोन उडवण्यात आल्याचा संशय आहे. जेणेकरून मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊ शकते आणि जीवितहानी होऊ शकते.



महाकुंभामुळे यावेळी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. अयोध्येतील राम मंदिर आणि परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. ड्रोन उडवण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. राम मंदिरावरून विमान उडवण्यासही परवानगी नाही. राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एसएसएफ म्हणजेच विशेष सुरक्षा दलाकडे आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी २०० सैनिक तैनात आहेत. असे असताना हा ड्रोन नेमका कुणी आणि का उडवला..? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या