दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, काही सेकंदापर्यंत हलली जमीन, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत होती. लोक भयभीत झाल्याने घराच्या बाहेर निघाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

याचे केंद्र दिल्लीच्या जवळ जमिनीपासून ५ किमी खोल होते. यामुळे याचे धक्के अधिक जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत राहिल्याने इमारतींच्या आतमध्ये जोरदार कंपन जाणवले. भूकंप सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांना आला. यामुळे लोकांची झोपच उडाली.

पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट


 



पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक पोस्ट करत लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. दिल्ली आणि जवळच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे तसेच योग्य ती सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करतो. अधिकाऱी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंग्र धौला कुआंमध्ये दुर्गाबाई कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता. जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथे एक नाला आहे. या परिसरात दर दोन ते तीन वर्षात एखादा लहान आणि कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसत असतात. २०१५मध्ये येथे ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.
Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या