दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, काही सेकंदापर्यंत हलली जमीन, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत होती. लोक भयभीत झाल्याने घराच्या बाहेर निघाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

याचे केंद्र दिल्लीच्या जवळ जमिनीपासून ५ किमी खोल होते. यामुळे याचे धक्के अधिक जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत राहिल्याने इमारतींच्या आतमध्ये जोरदार कंपन जाणवले. भूकंप सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांना आला. यामुळे लोकांची झोपच उडाली.

पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट


 



पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक पोस्ट करत लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. दिल्ली आणि जवळच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे तसेच योग्य ती सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करतो. अधिकाऱी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंग्र धौला कुआंमध्ये दुर्गाबाई कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता. जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथे एक नाला आहे. या परिसरात दर दोन ते तीन वर्षात एखादा लहान आणि कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसत असतात. २०१५मध्ये येथे ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.
Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी