Entertainment News : राधा की कान्हा ? मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी!

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीकडून गोड बातमी समोर आली आहे. 'स्वराज्यजननी जिजामाता', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री अमृता पवारने एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. अमृताने २०२२ मध्ये नील पाटीलसोबत लग्न केलं आणि तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अमृता आणि नील यांच्या लग्नाला दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांच्या सुखी संसारात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अमृताने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओमार्फत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.



अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीला एका एस्केलेटलरवरून दोन चपलांचे जोड खाली येताना दिसत आहेत. त्यानंतर अगदीच एक-दोन पायऱ्यांचं अंतर सोडून तिथे लहान मुलाची चप्पल दिसतेय. अखेरीस या तिन्ही चपला एस्केलेटलरच्या शेवटी येऊन पोहोचतात. त्यानंतर या व्हिडिओचा खरा अर्थ समजतो आहे. अमृताने हा व्हिडिओ शेअर करत "बेबी ऑन द वे..." असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे तिचे चाहते सुद्धा प्रचंड खुश झाले आहेत. अमृताचं काल डोहाळे जेवण देखील पार पडलं असून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.





दरम्यान अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओ नंतर तिचे मित्रमैत्रिणी, सहकलाकार तसेच तिचे चाहते तिला पुढील वाटचालीसाठी भरभरभरून शुभेच्छा देत आहेत.

Comments
Add Comment

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई