पंतप्रधानांच्या हस्ते होणार सोल लीडरशिपचे उद्घाटन

  91

मुंबई (वार्ताहर) : 'नेतृत्व' या संकल्पनेवरील चर्चा आणि विचारांमध्ये एक नवा अध्याय सुरू करत स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची सोल लीडरशिप परिषदेची पहिली आवृत्ती २१ आणि २२ फेब्रुवारी २०२५ भारत मंडपम, नवी दिल्लीमध्ये सुरू होत आहे. या दोन दिवसांमध्ये राजकारण, क्रीडा, कला आणि प्रसिद्धीमाध्यमे, आध्यात्मिक जग, सार्वजनिक धोरण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील नेते आपल्या नेतृत्वापर्यंतच्या वैयक्तिक प्रवासाविषयी बोलण्यासाठी, माहितीपूर्ण, सार्थक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विचारवंतांच्या नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठी परिवर्तनकारी नेतृत्वाचे अनुभव इतरांसमोर मांडण्यासाठी एकत्र येणार आहेत.

सोल लीडरशिप परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी ते स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिपची औपचारिक घोषणा देखील करतील. हे एक प्रमुख, खाजगी वित्तपुरवठ्यावर चालवले जाणार असलेले नेतृत्व संस्थान आहे. समान विचारधारा असलेल्या व्यक्तींनी याची स्थापना केली आहे. यामध्ये एमिरेट्स, टोरेंट ग्रुपचे अध्यक्ष सुधीर मेहता, एचडीएफसी लिमिटेडचे माजी अध्यक्ष दीपक पारेख, सन फार्मास्युटिकल्सचे एमडी दिलीप संघवी, झायडस लाईफसायन्सेस लिमिटेडचे अध्यक्ष पंकज पटेल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आणि कोटक महिंद्रा बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक उदय कोटक यांचा समावेश आहे. सोल लीडरशिप परिषदेचे उद्घाटन 'नेतृत्वाकडे' पाहण्याच्या आणि त्याविषयी चर्चा करण्याच्या पद्धतीला आकार देणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल.

उज्ज्वल व अधिक समावेशी भविष्यासाठी उद्देश

या दोन दिवसांमध्ये दिग्गज नेत्यांमध्ये नेतृत्वाविषयी चर्चा आणि माहितीपूर्ण सत्रे होतील, जे त्यांचे यशापयशाचे व्यक्तिगत अनुभव सर्वांसमोर मांडतील. आवड जागवणे, पारंपरिक समजुतींना आव्हान देणे आणि नेत्यांच्या पुढील पिढीला साहसी विचार करण्यासाठी सक्षम करणे व अधिक उज्ज्वल व अधिक समावेशी भविष्यासाठी एक उद्देश घेऊन काम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
Comments
Add Comment

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी