पंतप्रधानांच्या हस्ते होणार सोल लीडरशिपचे उद्घाटन

मुंबई (वार्ताहर) : 'नेतृत्व' या संकल्पनेवरील चर्चा आणि विचारांमध्ये एक नवा अध्याय सुरू करत स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची सोल लीडरशिप परिषदेची पहिली आवृत्ती २१ आणि २२ फेब्रुवारी २०२५ भारत मंडपम, नवी दिल्लीमध्ये सुरू होत आहे. या दोन दिवसांमध्ये राजकारण, क्रीडा, कला आणि प्रसिद्धीमाध्यमे, आध्यात्मिक जग, सार्वजनिक धोरण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील नेते आपल्या नेतृत्वापर्यंतच्या वैयक्तिक प्रवासाविषयी बोलण्यासाठी, माहितीपूर्ण, सार्थक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विचारवंतांच्या नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठी परिवर्तनकारी नेतृत्वाचे अनुभव इतरांसमोर मांडण्यासाठी एकत्र येणार आहेत.

सोल लीडरशिप परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी ते स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिपची औपचारिक घोषणा देखील करतील. हे एक प्रमुख, खाजगी वित्तपुरवठ्यावर चालवले जाणार असलेले नेतृत्व संस्थान आहे. समान विचारधारा असलेल्या व्यक्तींनी याची स्थापना केली आहे. यामध्ये एमिरेट्स, टोरेंट ग्रुपचे अध्यक्ष सुधीर मेहता, एचडीएफसी लिमिटेडचे माजी अध्यक्ष दीपक पारेख, सन फार्मास्युटिकल्सचे एमडी दिलीप संघवी, झायडस लाईफसायन्सेस लिमिटेडचे अध्यक्ष पंकज पटेल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आणि कोटक महिंद्रा बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक उदय कोटक यांचा समावेश आहे. सोल लीडरशिप परिषदेचे उद्घाटन 'नेतृत्वाकडे' पाहण्याच्या आणि त्याविषयी चर्चा करण्याच्या पद्धतीला आकार देणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल.

उज्ज्वल व अधिक समावेशी भविष्यासाठी उद्देश

या दोन दिवसांमध्ये दिग्गज नेत्यांमध्ये नेतृत्वाविषयी चर्चा आणि माहितीपूर्ण सत्रे होतील, जे त्यांचे यशापयशाचे व्यक्तिगत अनुभव सर्वांसमोर मांडतील. आवड जागवणे, पारंपरिक समजुतींना आव्हान देणे आणि नेत्यांच्या पुढील पिढीला साहसी विचार करण्यासाठी सक्षम करणे व अधिक उज्ज्वल व अधिक समावेशी भविष्यासाठी एक उद्देश घेऊन काम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
Comments
Add Comment

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी

पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मुंबई  : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची

पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील सात जिल्ह्यांत पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून, आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच