महाकुंभात ५१ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान

प्रयागराज (वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. तेव्हापासून शनिवार,१५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिल्याचे वृत्तसंस्थेने दिले आहे.

आज १.१८ कोटी भाविकांचे पवित्र स्नान उ. प्रदेश सरकारच्या माहिती विभागानुसार, रविवार १६ फेब्रुवारीला दुपारपर्यंत १.१८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमानात पवित्र स्थान केल्याचे देखील सांगितले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती अशा पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १४४ वर्षांनी विशेष असलेल्या या महाकुंभमेळ्याला देश-विदेशातील अनेक भाविक संगमस्नानासाठी व कल्पवासासाठी प्रयागराजमध्ये दाखल हाेत आहेत.

४५ दिवसांचा महाकुंभमेळा

उ. प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा २०१३मध्ये झाला होता. त्यानंतर २०१९मध्ये अर्धकुंभमेळा झाला. तो दर ६ वर्षांनी होतो. आता तब्बल १२ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभ मेळ्यास त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी लाखो भाविक येत आहेत.
Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या