महाकुंभात ५१ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान

प्रयागराज (वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. तेव्हापासून शनिवार,१५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिल्याचे वृत्तसंस्थेने दिले आहे.

आज १.१८ कोटी भाविकांचे पवित्र स्नान उ. प्रदेश सरकारच्या माहिती विभागानुसार, रविवार १६ फेब्रुवारीला दुपारपर्यंत १.१८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमानात पवित्र स्थान केल्याचे देखील सांगितले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती अशा पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १४४ वर्षांनी विशेष असलेल्या या महाकुंभमेळ्याला देश-विदेशातील अनेक भाविक संगमस्नानासाठी व कल्पवासासाठी प्रयागराजमध्ये दाखल हाेत आहेत.

४५ दिवसांचा महाकुंभमेळा

उ. प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा २०१३मध्ये झाला होता. त्यानंतर २०१९मध्ये अर्धकुंभमेळा झाला. तो दर ६ वर्षांनी होतो. आता तब्बल १२ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभ मेळ्यास त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी लाखो भाविक येत आहेत.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे