MHADA Home : दक्षिण मुंबईतील १३ हजार इमारतींचा पुनर्विकास करण्यास म्हाडा सज्ज

मुंबई  : मुंबईमध्ये आठ ते दहा दशके जुन्या असलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या समूह पुनर्विकास याकडे म्हाडाने आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या इमारतींच्या अरुंद जागेमुळे एकाच पुनर्विकासात अनेक तांत्रिक अडथळे येत असल्याने तेथे राहणाऱ्या भाडेकरू व मालकांना पुरेशा सुविधा मिळू शकत नाहीत. त्यामुळे म्हाडा आता क्लस्टर पुनर्विकासाला चालना देण्यासाठी पावले उचलत आहे आणि अधिकाधिक इमारत मालक आणि भाडेकरूंना विकास नियंत्रण नियम ३३(९) अंतर्गत पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील सुमारे १३,००० मोडकळीस आलेल्या उपकर इमारती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना विभागाअंतर्गत येतात. याअंतर्गत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दादर परिसरातील १२ अधिग्रहित आणि पुनर्बांधणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिली. यावेळी भाडेकरूंशी बोलून त्यांना समूह पुनर्विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.



समूह पुनर्विकास योजनेत बैठ्या चाळींचाही समावेश करण्यात आला आहे. जयस्वाल यांनी प्रभादेवीतील शंकर घाणेकर मार्गावरील बैठी चाळ आणि जनार्दन अपार्टमेंट या खासगी मालमत्तांचा समावेश विकास नियंत्रण नियम ३३ (९) अन्वये समूह पुनर्विकास योजनेत करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जयस्वाल यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या 'ग' उत्तर विभागातील जसोदा सहकारी गृहनिर्माण संस्था, स्वामी समर्थ आणि म्हाडा कायदा कलम ९१ (ए) अंतर्गत अधिग्रहित केलेल्या आरके इमारतीची पाहणी केली. आणि रखडलेली पुनर्विकासाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी