खोटे बोलून, खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे - देवेंद्र फडणवीस

नागपूर: खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लव्ह जिहाद' कायद्याचे रविवारी समर्थन केले. नागपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी लव्ह जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचा मानस व्यक्त केला. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात ही घोषणा करण्यात आली असून समितीचे सदस्य कोण असतील, त्याची कार्यपद्धती कशी असेल? याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. याबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आली आहे.


केरळ उच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काही नाही. पण खोटे बोलून, खोटी ओळख तयार करून, फसवणूक करून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे, ही प्रवृत्ती समाजात पसरत आहे. जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे योग्य नाही. त्यामुळे यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल ती राज्य सरकारकडून केली जाईल.


दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही आता लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी सरकारने राज्य पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. ही समिती लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर थांबवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना सुचवणार आहे.


महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आलंय. इतर अनेक राज्यांमध्येही राज्य सरकारांनी कथित लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर थांबवण्यासाठी पावले उचललीत आणि आता महाराष्ट्रदेखील यात सामील होणार आहे.



जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी समिती उपाय योजणार


लव्ह जिहाद हा शब्द अनेकदा उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि संघटना वापरतात, असा आरोप बऱ्याचदा केला जातो. मुस्लीम पुरुषांकडून हिंदू मुली किंवा महिलांशी लग्न करून त्यांना इस्लाम धर्मात रूपांतरित करणे म्हणजेच लव्ह जिहाद असल्याचे बोलले जाते.


महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये महाराष्ट्राचे डीजीपी, महिला आणि बाल कल्याण विभाग, अल्पसंख्याक विभाग, कायदा आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे उपसचिव यांचा समावेश आहे. राज्य सरकारने शुक्रवारी या संदर्भात आदेश जारी केलेत. आदेशात म्हटले आहे की, अभ्यासानंतर समिती लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मातर करण्याच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी कोणते उपाय योजता येतील हे सांगणार आहे. ही समिती इतर राज्यांमधील यासंबंधीच्या कायद्यांचाही अभ्यास करणार असून, धर्मातर थांबवण्यासाठी तरतुदीदेखील सुचवेल आणि त्याच्या कायदेशीर पैलूंची सुद्धा चाचपणी केली जाईल.


Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास