कर्जत रेल्वे फलाटावरील सरकते जिने सुरू

कर्जत (वार्ताहर) : कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवरील मुंबईकडील सरकत्या जिन्यांचे काम पूर्ण झाले असून हे दोन्ही जिने सुरू करण्यात आले आहेत. या जिन्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच महिला प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. खरे तर हे दोन्ही जिने २७ जानेवारीला सुरू होणार होते; परंतु काम पूर्ण न झाल्याने तो मुहूर्त टाळला होता.

कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी सरकता जिना उपलब्ध करून दिला आहे. तसेच फलाट क्रमांक एक वर सुद्धा एक चढण्यासाठी व एक उतरण्यासाठी अशा दोन सरकत्या जिन्यांचे काम काही महिन्यांपासून सुरू होते. या सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. ते कधी पूर्ण होणार आणि त्याचा उपयोग कधी होणार असा प्रश्न प्रवासी वर्ग उपस्थित करीत आहे. याबाबत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना सदर दोन्ही सरकत्या जिन्यांचे काम प्रगती पथावर आहे. हे सरकते जिने २७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू होण्याचे शक्यता आहे. असे लेखी कळविले आहे; परंतु काम पूर्ण न झाल्याने २७ तारखेचा मुहूर्त टळला होता.

त्यांनतर ओसवाल यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. हे जिने कधी सुरू होणार असे विचारले असता काम पूर्ण झाल्यावर कधीही सुरू होतील. असे मोघम उत्तर दिले. ते उत्तर ओसवाल यांच्या पर्यंत पोहोचता पोहोचता हे दोन्ही जिने सुरु सुद्धा करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाचा समन्वयाचा अभाव दिसून आला. हे जिने सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच महिला प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह