कर्जत रेल्वे फलाटावरील सरकते जिने सुरू

कर्जत (वार्ताहर) : कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवरील मुंबईकडील सरकत्या जिन्यांचे काम पूर्ण झाले असून हे दोन्ही जिने सुरू करण्यात आले आहेत. या जिन्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच महिला प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. खरे तर हे दोन्ही जिने २७ जानेवारीला सुरू होणार होते; परंतु काम पूर्ण न झाल्याने तो मुहूर्त टाळला होता.

कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी सरकता जिना उपलब्ध करून दिला आहे. तसेच फलाट क्रमांक एक वर सुद्धा एक चढण्यासाठी व एक उतरण्यासाठी अशा दोन सरकत्या जिन्यांचे काम काही महिन्यांपासून सुरू होते. या सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. ते कधी पूर्ण होणार आणि त्याचा उपयोग कधी होणार असा प्रश्न प्रवासी वर्ग उपस्थित करीत आहे. याबाबत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना सदर दोन्ही सरकत्या जिन्यांचे काम प्रगती पथावर आहे. हे सरकते जिने २७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू होण्याचे शक्यता आहे. असे लेखी कळविले आहे; परंतु काम पूर्ण न झाल्याने २७ तारखेचा मुहूर्त टळला होता.

त्यांनतर ओसवाल यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. हे जिने कधी सुरू होणार असे विचारले असता काम पूर्ण झाल्यावर कधीही सुरू होतील. असे मोघम उत्तर दिले. ते उत्तर ओसवाल यांच्या पर्यंत पोहोचता पोहोचता हे दोन्ही जिने सुरु सुद्धा करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाचा समन्वयाचा अभाव दिसून आला. हे जिने सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच महिला प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य