‘कोस्टल रोड परिसरातील खेळाचे मैदान विकसित करा’

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, त्या जागेपैकी ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी या पत्राद्वारे केली आहे.

मोकळ्या जागेच्या योग्य उपयोगासाठी आणि युवकांना खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फुटबॉलचे मैदान, क्रिकेटचे मैदान, रनिंग ट्रॅक तसेच कबड्डी सारख्या पारंपरिक खेळांसाठी मैदान उभारण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, उर्वरित १५० एकर जागेवर भव्य उद्यान आणि वृक्षारोपण करण्यात यावे, यावरही त्यांनी भर दिला आहे.
पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध होईल की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे या संधीचा उपयोग करून विविध खेळाची मैदाने निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यास युवा पिढीला खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि मुंबईकरांसाठी देखील एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जाईल. या प्रस्तावाची योग्य दखल घेऊन आवश्यक सरकारी परवानग्या व प्रक्रियांच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत