Weather Update : राज्यासह देशभरात उन्हाच्या झळांची तीव्रता वाढणार!

पुढील चार दिवस तापमानात १-२ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे


मुंबई : हवेच्या वरच्या स्थरात असलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि उत्तरेत थंडीच्या लाटांसह थंड हवेचे झोत येण्याची शक्यता नसल्यामुळे राज्यासह देशभरात फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरीत दिवसांमध्ये उन्हाच्या झळांची तीव्रता (Heat Wave) वाढणार आहे. (Weather Update) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात सोमवारपासून हवेच्या वरच्या स्थरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेत असलेले थंड वारे राज्यापर्यंत येणार नाहीत. शिवाय उत्तर भारतात पुढील आठवडाभरात थंड हवेचे झोत अथवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तरेतून राज्यात थंड हवा येण्याची शक्यता मावळली आहे.



परिणामी उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात भर म्हणून बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे राज्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस तापमानात आणखी एक – दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे आहेत.


उत्तरेत थंड हवेचे झोत म्हणजेच पश्चिमी थंड वारे येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे उत्तरेतही पहाटेच्या तापमानात वाढ होऊन तापमान स्थिर झाले आहे. पुढील चार – पाच दिवसांत उत्तरेही कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेल, असा अंदाज आहे. राज्यातील सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअवर गेले आहे. (Weather Update)


पुढील चार दिवस कमाल – किमान तापमानात आणखी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपासून तापमान वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी दिली.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ