कोकण रेल्वे मार्गावर महाकुंभ मेळ्यासाठी विशेष रेल्वे गाडी

रत्नागिरी : प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला जाण्याकरिता कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. उडुपी ते प्रयागराज जंक्शन आणि परत या मार्गावर ही गाडी धावेल. त्याचा तपशील असा - गाडी क्र. ०११९२ उडुपी टुंडला जंक्शन गाडी सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल.


ही गाडी टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी (बुधवार, १९ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला गाडी क्र. ०११९१ गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी उडुपीला पोहोचेल.


ही गाडी बारकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड, बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, मदनीक, माणिकपूर, जं. प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन येथे थांबेल.गाडीला एकूण २० डबे असतील. त्यातील 2 टायर एसी १ कोच, 3 टायर एसी ५ कोच, -स्लीपर १० कोच, जनरल – २ आणि एसएलआर २ कोच असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडून मरण पावले. ही दुर्घटना

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :