नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर ही घटना घडली.


घटनेच्या वेळेस हजारोच्या संख्येने भक्तगण प्रयागराज महाकुंभ येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर एकत्रित जमले होते. तसेच रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. घटनेची सूचना मिळताच दिल्लीच्या एलजी वीके सक्सेना आणि माजी मुख्यमंत्री आतिशी जखमींची विचारपूस कऱण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.



कधी घडली ही दुर्घटना?


चेंगराचेंगरीची ही दुर्घटना दहा वाजण्याच्या सुमारास घडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोक जमले होती. पोलीस उपायुक्तांच्या माहितीनुसार, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १४वर उभी होती तेव्हा मोठ्या संख्येने लोक तेथे उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होती आणि या रेल्वेचे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर होते.





रेल्वे पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी जखमींना एलएनजेपी आणि लेडी होर्डिंग रुग्णालयात दाखल केले. तर गर्दी आणि हंगामामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. रेल्वे म्हटले, ही घटना महाकुंभसाठी हजारो भक्त प्लॅटफॉर्मवर एकत्रित आल्याने घडली.



पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख




नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृ्यू झाला. या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे करण्याची देवाला प्रार्थना करतो. तसेच या सर्व लोकांना सर्वतोपरी मदत करावे असे अधिकाऱ्यांना सांगतो.



राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक


नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. मी या चेंगराचेंगरीत बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते.

 

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला