Catamaran Boat : मुंबईकरांचा समुद्र प्रवास होणार जलद! धावणार वातानुकूलित कॅटामरान बोट

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गांवरून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे. उच्च गती, अद्ययावत सुविधा आणि अधिक सुरक्षिततेसह ही बोट प्रवाशांसाठी जलप्रवासाचा नवा अनुभव घेऊन येत आहे. पारंपरिक फेरीसेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची हमी देणार आहे. (Catamaran Boat)



समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे आणि शहरांना जलमार्गाने मुंबईशी जोडण्याचे काम पारंपरिक फेरी बोटी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, भाऊचा धक्का ते मोरा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गांवर पारंपरिक जलवाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र ही सेवा प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. तसेच सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ती सुधारण्याची गरज आहे. सध्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक, प्रदूषण आणि अपुरे रस्ते या समस्यांचा विचार करता प्रशासनाने रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांवर मोठा खर्च केला आहे. तरीही वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जलमार्गाच्या विकासावर भर दिला जात आहे.


गेल्या काही वर्षांत मुंबईत अत्याधुनिक वॉटर टॅक्सी आणि रो-रो बोटी सुरू करण्यात आल्या आहेत. आता त्याच धर्तीवर, पारंपरिक फेरी बोटींसोबतच अत्याधुनिक कॅटामरान बोट आणण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेने घेतला होता. त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांची वातानुकूलित कॅटामरान बोट खरेदी करण्यात आलेली असून ही बोट मुंबईत दाखल झाली आहे. (Catamaran Boat)


मुंबईतील जलवाहतुकीसाठी हा मोठा टप्पा आहे. पारंपरिक फेरी बोटींपेक्षा ही अत्याधुनिक कॅटामरान बोट वेगवान, अधिक सुरक्षित आणि आरामदायी आहे. विशेषतः पर्यटक आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरेल. यामुळे एलिफंटा आणि मांडवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढेल, तसेच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था, सचिव, शराफत मुकादम यांनी म्हटले.

Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत