Catamaran Boat : मुंबईकरांचा समुद्र प्रवास होणार जलद! धावणार वातानुकूलित कॅटामरान बोट

  78

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गांवरून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे. उच्च गती, अद्ययावत सुविधा आणि अधिक सुरक्षिततेसह ही बोट प्रवाशांसाठी जलप्रवासाचा नवा अनुभव घेऊन येत आहे. पारंपरिक फेरीसेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची हमी देणार आहे. (Catamaran Boat)



समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे आणि शहरांना जलमार्गाने मुंबईशी जोडण्याचे काम पारंपरिक फेरी बोटी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, भाऊचा धक्का ते मोरा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गांवर पारंपरिक जलवाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र ही सेवा प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. तसेच सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ती सुधारण्याची गरज आहे. सध्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक, प्रदूषण आणि अपुरे रस्ते या समस्यांचा विचार करता प्रशासनाने रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांवर मोठा खर्च केला आहे. तरीही वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जलमार्गाच्या विकासावर भर दिला जात आहे.


गेल्या काही वर्षांत मुंबईत अत्याधुनिक वॉटर टॅक्सी आणि रो-रो बोटी सुरू करण्यात आल्या आहेत. आता त्याच धर्तीवर, पारंपरिक फेरी बोटींसोबतच अत्याधुनिक कॅटामरान बोट आणण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेने घेतला होता. त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांची वातानुकूलित कॅटामरान बोट खरेदी करण्यात आलेली असून ही बोट मुंबईत दाखल झाली आहे. (Catamaran Boat)


मुंबईतील जलवाहतुकीसाठी हा मोठा टप्पा आहे. पारंपरिक फेरी बोटींपेक्षा ही अत्याधुनिक कॅटामरान बोट वेगवान, अधिक सुरक्षित आणि आरामदायी आहे. विशेषतः पर्यटक आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरेल. यामुळे एलिफंटा आणि मांडवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढेल, तसेच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था, सचिव, शराफत मुकादम यांनी म्हटले.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती