Catamaran Boat : मुंबईकरांचा समुद्र प्रवास होणार जलद! धावणार वातानुकूलित कॅटामरान बोट

  98

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गांवरून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे. उच्च गती, अद्ययावत सुविधा आणि अधिक सुरक्षिततेसह ही बोट प्रवाशांसाठी जलप्रवासाचा नवा अनुभव घेऊन येत आहे. पारंपरिक फेरीसेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची हमी देणार आहे. (Catamaran Boat)



समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे आणि शहरांना जलमार्गाने मुंबईशी जोडण्याचे काम पारंपरिक फेरी बोटी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, भाऊचा धक्का ते मोरा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गांवर पारंपरिक जलवाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र ही सेवा प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. तसेच सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ती सुधारण्याची गरज आहे. सध्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक, प्रदूषण आणि अपुरे रस्ते या समस्यांचा विचार करता प्रशासनाने रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांवर मोठा खर्च केला आहे. तरीही वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जलमार्गाच्या विकासावर भर दिला जात आहे.


गेल्या काही वर्षांत मुंबईत अत्याधुनिक वॉटर टॅक्सी आणि रो-रो बोटी सुरू करण्यात आल्या आहेत. आता त्याच धर्तीवर, पारंपरिक फेरी बोटींसोबतच अत्याधुनिक कॅटामरान बोट आणण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेने घेतला होता. त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांची वातानुकूलित कॅटामरान बोट खरेदी करण्यात आलेली असून ही बोट मुंबईत दाखल झाली आहे. (Catamaran Boat)


मुंबईतील जलवाहतुकीसाठी हा मोठा टप्पा आहे. पारंपरिक फेरी बोटींपेक्षा ही अत्याधुनिक कॅटामरान बोट वेगवान, अधिक सुरक्षित आणि आरामदायी आहे. विशेषतः पर्यटक आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरेल. यामुळे एलिफंटा आणि मांडवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढेल, तसेच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था, सचिव, शराफत मुकादम यांनी म्हटले.

Comments
Add Comment

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित