Ambernath Temple : अंबरनाथचे शिवमंदिर जागतिक पातळीवर झळकणार!

उल्हासनगर : उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहेत. शनिवारी अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांची पाहणी करताना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. धार्मिक स्थळांचे संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधांचा विकास, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे रूप पालटणार असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. (Ambernath Temple)



अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी १४० कोटींचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा उद्देश असून, काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा संपूर्ण विकास काळ्या पाषाणात होणार आहे. भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. मंदिरासमोरील चौकात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, वाहनतळ, भक्तनिवास आणि प्रदर्शन केंद्राची उभारणीदेखील करण्यात येणार आहे. तसेच प्राचीन कुंडाचे जतन आणि घाटाची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे, वाराणसीप्रमाणेच या ठिकाणी भाविकांना घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्णत्वास आले असून, घाट उभारणीला वेग आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या कायापालट होणार आहे. (Ambernath Temple)

Comments
Add Comment

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी