Shivshahi Bus Accident : धावत्या शिवशाही बसचं टायर निखळलं अन् ५० प्रवासी...

अमरावती : अमरावतीहून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस नागपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. (Shivshahi Bus Accident)



मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघून आलं. भरधाव बसचं टायर निखळल्यानंतर ते लांब अंतरावर गेलं. मात्र सुदैवाने ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला. अमरावती नागपूर महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली. काही दिवसांपूर्वी परतवाडा आगाराच्या बसचा ही अशाच प्रकारे टायर निघून आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनानंतर एसटी महामंडळाचे बसच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.


दरम्यान, या घटनेचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल केला जात आहे. (Shivshahi Bus Accident)
Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे