बीकेसी-कुलाबा मेट्रोचा 'टप्पा २ अ' मार्च अखेर खुला

मुंबई (प्रतिनिधी) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३' भुयारी मार्गिकेवरील बीकेसी- कुलाबा टप्पा मार्गिकेचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील बीकेसी-आचार्य अत्रे चौक, वरळी टप्पा २ 'अ' मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नियोजन आहे. त्यानुसार 'टप्पा २ अ' च्या कामालाही वेग देण्यात आला आहे. यातील स्थानकांचे ९८.९ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच 'टप्पा २ अ'चे स्थापत्य आणि प्रणालीचे काम पूर्ण केले जाईल. तसेच तो वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येईल.



मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचे काम 'एमएमआरसी' करीत आहे. ३३.५ किमीच्या या भुयारी मेट्रो मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा अंदाजे १२ किमीचा टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला. या मार्गिकेला अद्याप प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे, असे असले तरी आरे- कुलाबा असा संपूर्ण मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रतिसाद वाढेल. त्यामुळे आता बीकेसी-कुलाबा टप्प्याचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आरे-कुलाबा मेट्रो-३ मार्गिका संचालनाचे नियोजन आहे. राज्य सरकारने बीकेसी-आचार्य अत्रे चौक, वरळी टप्पा १०० दिवसांत कार्यान्वित करा, असे निर्देश काही दिवसांपूर्वी 'एमएमआरसी'ला दिले आहेत. बीकेसी कुलाबा मार्गिकेचे एकूण ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बीकेसी- कुलाबा मार्गिकेतील बीकेसी-वरळी 'टप्पा २ अ' मार्गिकेतील स्थानकांचे ९८.९ टक्के काम पूर्ण झाले आहे.



प्रणालीचे काम ८५.८ टक्के पूर्ण

बीकेसी - वरळी टप्पा २ अ मधील प्रणालीच्या (सिस्टिम) कामाला वेग देण्यात आला आहे. त्यानुसार प्रणालीचे काम ८५.८ टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून बीकेसी- वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात