Rail Neer Bottle : मध्य, पश्चिम रेल्वेवर रेल नीर बाटलीबंद पाण्याचा तुटवडा

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनतर्फे रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून रेलनीरचे उत्पादन अंबरनाथ येथील कारखान्यात करण्यात येत आहे. येथे तयार केलेल्या बाटल्या मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात पुरवल्या जातात. मात्र अंबरनाथ येथील ‘रेलनीर’ कारखान्याच्या नूतनीकरण आणि वार्षिक देखभालीचे काम सुरू आहे. त्यामुळे रेलनीर बाटलीबंद पाण्याचा मध्य, पश्चिम रेल्वेवर तुटवडा निर्माण होऊ लागला आहे.



मुंबई महानगरात तापमान वाढत असल्याने उन्हाच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे बाटलीबंद पाण्याने तहान भागविण्याकडे अनेकांचा कल आहे. परिणामी बाटलीबंद पाण्याच्या खरेदीत वाढ झाली आहे. परंतु, मुंबईतील रेल्वे स्थानकांत ‘रेलनीर’ पाण्याच्या बाटल्यांचा अपुरा पुरवठा होऊ लागला असून रेलनीरच्या बाटल्या रेल्वे स्थानकातील स्टाॅलवर उपलब्ध नाहीत. इतर रेल्वेने अधिकृतरित्या रेल्वे स्थानकात रेलनीर व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खासगी बाटलीबंद पाणी विकण्यास परवानगी दिली आहे.मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा / कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांत, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकांत ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो.


परंतु, सध्या रेलनीरचे उत्पादन घटल्याने बाटलीबंद पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. याबाबत प्रवाशांनी ‘एक्स’वर तक्रार केली आहे. दरम्यान, रेलनीरचा साठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागीय कार्यालयाने ‘बिस्लेरी’, ‘स्वीट’, ‘झुरिका’, ‘रोकोको’, ‘क्लिअर’ यांसारख्या इतर खासगी बाटलीबंद पाणी स्टाॅलवर विकण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक खात्यातून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक