धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस

  132

बीड : कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे मागील कही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आधी सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीखोर वाल्मिक कराड या प्रकरणाशी संबंधित असल्याचे आरोप झाले आणि धनंजय मुंडेंपुढे अडचणी निर्माण झाल्या. पाठोपाठ धनंजय मुंडेंना कौटुंबिक पातळीवर मोठा धक्का बसला. मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने करुणा शर्माला पोटगी द्या, असे निर्देश धनंजय मुंडेंना दिले. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.



विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली असा आरोप करत करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली. या प्रकरणात परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.



धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठी ते परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी पत्नी म्हणून राजश्री मुंडे आणि तीन मुलींचा तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावरील संपत्तीबाबत माहिती देणे टाळले होते. ही माहिती लपवल्याप्रकरणी करुणा शर्मा यांनी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने धनंजय मुंडे यांना उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात होणार आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या