Ratnagiri : नवग्रह मंदिरात शनिवारपासून नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा

रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाचणे रोडवरील पॉवर हाऊसजवळील श्री गजानन महाराज मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिर नव्याने बांधण्यात आले असून येत्या शनिवारी, दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृतीमंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी दिली.



नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात आज आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी प्रवीण ऊर्फ अण्णा कवितके उपस्थित होते. माहिती देताना श्री. देसाई म्हणाले, नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच गजानन महाराज प्रकट दिन सोहळा या निमित्ताने १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समितीतील महिलांच्या हस्ते नवग्रहांवर जलस्नानाच्या मोठ्या कार्यक्रमाने होणार आहे. नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.