Namo The Central Park : नमो द ग्रँड सेंट्रल पार्कला १३.७० लाख पर्यटकांनी दिली भेट

ठाणे : शहरातील कोलशेत येथे उभारण्यात आलेले 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क' हे ठाणेकरांसह मुंबई महानगरातील नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतसाठीच्या अनेक सोयीसुविधा या पार्कमध्ये असल्याने वर्षभरात या पार्कला १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. या नागरिकांच्या भेटीमुळे पार्कला २ कोटी ८२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.


ठाणे शहरातील कोलशेत परिसरात सुमारे २०.५ एकर जागेवर नमो द ग्रँड सेंट्रल पार्क या उद्यानाची उभारणी फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आली. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. तसेच या उद्यानात विविध प्रकारची तीन हजार ५०० फुले-फळझाडे आहेत. त्याचप्रमाणे पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० हुन अधिक प्रजाती आढळून येत आहेत. ९ फेब्रुवारी २०२४ पासून हे उद्यान नागरिकांसाठी खुले झाले. ठाणे शहरासाठीच नव्हे तर, मुंबई महानगरातील हे सर्वात मोठे उद्यान आहे. यामुळे मुंबई महानगरातील नागरिकांसाठी हे उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. तसेच मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, जॉगर्ससाठी ट्रॅक आणि वृद्धांसाठी निवांत बसण्याची जागा यामुळे सर्व वयोगटांतील नागरिकांना या उद्यानाची आवड निर्माण झाली आहे. यामुळे या उद्यानात वर्षभरात ९ फेब्रुवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत उद्यानात १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. नागरिकांच्या या भेटीमुळे पार्कला २ कोटी ८२ लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.



ठाणे महापालिकेकडून या उद्यानात १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. तर, प्रौढांकडून २० रुपये शुल्क आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रौढांकडून ३० रुपये शुल्क आकारण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांकडून प्रति दिवस १० रुपये शुल्क घेण्यात येत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मासिक पासची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून

करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून जान्हवी कपूरची एक्झिट, करण म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरच्या 'धर्मा' टॅलेंट एजन्सीमधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल

मुंबई : टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; आता 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील

एकेकाळी रणवीरवर नाराज असणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने आता केले रणवीरचे तोंडभरून कौतुक; म्हणाला ....

काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती.