Namo The Central Park : नमो द ग्रँड सेंट्रल पार्कला १३.७० लाख पर्यटकांनी दिली भेट

ठाणे : शहरातील कोलशेत येथे उभारण्यात आलेले 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क' हे ठाणेकरांसह मुंबई महानगरातील नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतसाठीच्या अनेक सोयीसुविधा या पार्कमध्ये असल्याने वर्षभरात या पार्कला १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. या नागरिकांच्या भेटीमुळे पार्कला २ कोटी ८२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.


ठाणे शहरातील कोलशेत परिसरात सुमारे २०.५ एकर जागेवर नमो द ग्रँड सेंट्रल पार्क या उद्यानाची उभारणी फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आली. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. तसेच या उद्यानात विविध प्रकारची तीन हजार ५०० फुले-फळझाडे आहेत. त्याचप्रमाणे पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० हुन अधिक प्रजाती आढळून येत आहेत. ९ फेब्रुवारी २०२४ पासून हे उद्यान नागरिकांसाठी खुले झाले. ठाणे शहरासाठीच नव्हे तर, मुंबई महानगरातील हे सर्वात मोठे उद्यान आहे. यामुळे मुंबई महानगरातील नागरिकांसाठी हे उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. तसेच मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, जॉगर्ससाठी ट्रॅक आणि वृद्धांसाठी निवांत बसण्याची जागा यामुळे सर्व वयोगटांतील नागरिकांना या उद्यानाची आवड निर्माण झाली आहे. यामुळे या उद्यानात वर्षभरात ९ फेब्रुवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत उद्यानात १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. नागरिकांच्या या भेटीमुळे पार्कला २ कोटी ८२ लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.



ठाणे महापालिकेकडून या उद्यानात १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. तर, प्रौढांकडून २० रुपये शुल्क आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रौढांकडून ३० रुपये शुल्क आकारण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांकडून प्रति दिवस १० रुपये शुल्क घेण्यात येत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मासिक पासची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत