मोहिनीराज यात्रेत आई जगदंबेचा गजर करत भळंद रंगला

  92

लखलखत्या अग्नीला तळहातावर घेऊन ‘भळंद’


नेवासा : भगवान विष्णूचे मोहिनी अवताराचे एकमेव स्थान असलेल्या नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिम्मित मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत बुधवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात "भळंद" कार्यक्रम पार पडला.


रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रेमुळे नेवासा शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण आहे.माघ शुध्द पोर्णिमेच्या राञी मंदिरा समोर उभारण्यात आलेल्या मंडपात संबळाच्या निनादात गोंधळ घालीत "भळंद" खेळत देव देवतेला यात्रा उत्सवाचे निमंत्रण दिल गेले आहे. तर दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादात देवीची भक्ती गीते गायली त्यांना राजेंद्र परदेशी, निखिल जोशी सुभाष चव्हाण यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली.श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमाचे अदिती जोशी, आदिनाथ जोशी, आर्यन जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात "भळंद" कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचे निमंत्रण दिले.



भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली यावेळी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली. बोल मोहिनीराज महाराज की जय... असा जयघोष यावेळी करण्यात आला. झालेल्या भळंद कार्यक्रमाचे पौरोहित्य पांडूगुरू जोशी, निखिल जोशी यांनी केले.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून