Pune News : पेपर सुरू असतानाच दुस-या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी!

  73

पुणे : कालपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षेदरम्यान पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर बारकोड चिटकवला. मात्र पुढे विद्यार्थ्याने असं काही केलं ज्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने पेपर सुरू झाल्यानंतर बारकोड चिटकवत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या विद्यार्थ्याने दुसऱ्या माळ्यावरून उडी मारली असता तो पहिल्या माळ्याच्या व्हरांड्यात पडला. तिथूनही उठून त्याने पुन्हा उडी मारली. त्यात त्याला किरकोळ दुखापत झाली. या वेळी केंद्रावर भरारी पथक होते. या प्रकारामध्ये त्याच्या हातापायाला दुखापत झाली.



या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन, उपस्थित कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेले. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी चौकशीत विद्यार्थ्याला परीक्षेचा ताण आल्याने त्याने हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत