महाकुंभ : माघ पौर्णिमेला दीड कोटी भाविकांचे स्नान

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात माध पौर्णिमेच्या निमित्ताने आज, बुधवारी सुमारे दीड कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केल्याची माहिती प्रशासनाने दिली.


प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमापासून १० किलोमीटर पर्यंत सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून आली. याठिकाणी मंगळवारी संध्याकाळपासूनच माघी पौर्णिमेचे स्नान सुरू झाले होते. रात्री उशिरा मोठ्या संख्येने भाविक संगमावर पोहोचले. तर आज, बुधवारी सकाळी भाविकांची संख्या वाढली.


हे स्नान बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. दिवसभरात सुमारे अडीच कोटी भाविक त्रिवेणी संगमात स्नान केले असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. माघ पौर्णिमा स्नानासाठी आलेल्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वाढती गर्दी पाहता प्रयागराजमध्ये वाहनांना प्रवेश बंद असून महाकुंभमेळा क्षेत्र 'नो व्हेईकल झोन' घोषित करण्यात आले होते.



उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाकुंभातील हे पाचवे स्नान आहे. महाशिवरात्रीचे स्नान अजून बाकी आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी एक चूक झाली. त्यातून धडा घेऊन अधिक चांगले व्यवस्थापन कसे करायचे, यावर आम्ही काम करत आहोत.


तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून प्रयागराज रेल्वे स्थानकांवर भाविकांची गर्दी कायम आहे. दररोज 100 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. शहरात मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 108 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यात उत्तर मध्य रेल्वेने 81 गाड्या, उत्तर रेल्वेकडून 10 आणि ईशान्य रेल्वेने 17 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्याचबरोबर, विशेष गाड्यादेखील सतत चालवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अयोध्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी - दत्तात्रेय होसबळे

नवी दिल्ली : अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेट्यांमधून झालेल्या चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे.

जम्मू-काश्मीर : सीआरपीएफचे वाहन उलटले; सहा जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या

History of Death Penalty : भारतात फाशी देण्यात आलेली एकमेव महिला कोण? सिया गोयल प्रकरणानंतर पुन्हा इतिहास चर्चेत

नवी दिल्ली : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agarwal Murder Case) मुख्य आरोपी सिया गोयलला फाशीची

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही