नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (IND vs END) यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पहिला धक्का बसला. दुसऱ्या षटकात १ धाव करून तो बाद झाला.
Crime : नात्याला काळीमा! वहिनीला घरात एकटं पाहून दीराकडून बलात्कार
यानंतर, विराट कोहली (Virat Kohli) क्रीजवर आला आणि शुभमन गिलसह जबाबदारी स्वीकारली. या जोडीने १० षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. ११ व्या षटकापर्यंत गिल आणि कोहलीमध्ये ५०धावांची भागीदारी झाली. यानंतर, दोघांनीही जलद धावा केल्या. भारताला १३ षटकांत ७९ धावांपर्यंत पोहोचवले. या काळात विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
अहमदाबाद वनडेत १६ धावांचा टप्पा गाठताच, कोहलीने इंग्लंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याआधी, तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. मास्टर ब्लास्टरने इंग्लंडविरुद्ध ३९९० धावा केल्या आहेत. तसेच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध ४०००धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ४००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.