Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

अहमदाबाद: टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही बाजी मारली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.


या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला हे आव्हान गाठता गाठता दमछाक झाली. इंग्लंडच्या संघाला ३४.२ षटकांत केवळ २१४ इतक्याच धावा करता आल्या.भारताने हा सामना तब्बल १४२ धावांनी जिंकला.


लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात धमाकेदार झाली. बेन डकेट आणि फिल सॉल्टने ६.२ षटकांत ६० धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर अर्शदीपने ही भागीदारी तोडली. त्याने दोन्ही खेळाडूंना बाद केले. यानंतर टॉम बँटनने आणि जो रूटने तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा केल्या. कुलदीप यादवने बँटनला बाद करत ही भागीदारीही तोडली. त्यानंतर अक्षऱ पटेलने अनुभवी ज्यो रूटला २४ धावांवर आणि हर्षित राणाने कर्णधार जोस बटलरहा ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नव्हती. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने ५१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले तर विराट कोहलीने ५० बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कोहलीच्या वनडे करिअरमधील हे ७३वे अर्धशतक होते.


शुभमन गिलनेही आपल्या करिअरमधील ७वे वेगवान शतक ठोकले. त्याने याआधीच्या दोन सामन्यांमध्येही चांगली खेळी केली होती. फलंदाजांनंतर गोलंदाजीमध्येही भारताने कमाल केली. भारतासाठी अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली कामगिरी केली.


Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून