Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

  104

अहमदाबाद: टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही बाजी मारली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.


या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला हे आव्हान गाठता गाठता दमछाक झाली. इंग्लंडच्या संघाला ३४.२ षटकांत केवळ २१४ इतक्याच धावा करता आल्या.भारताने हा सामना तब्बल १४२ धावांनी जिंकला.


लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात धमाकेदार झाली. बेन डकेट आणि फिल सॉल्टने ६.२ षटकांत ६० धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर अर्शदीपने ही भागीदारी तोडली. त्याने दोन्ही खेळाडूंना बाद केले. यानंतर टॉम बँटनने आणि जो रूटने तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा केल्या. कुलदीप यादवने बँटनला बाद करत ही भागीदारीही तोडली. त्यानंतर अक्षऱ पटेलने अनुभवी ज्यो रूटला २४ धावांवर आणि हर्षित राणाने कर्णधार जोस बटलरहा ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नव्हती. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने ५१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले तर विराट कोहलीने ५० बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कोहलीच्या वनडे करिअरमधील हे ७३वे अर्धशतक होते.


शुभमन गिलनेही आपल्या करिअरमधील ७वे वेगवान शतक ठोकले. त्याने याआधीच्या दोन सामन्यांमध्येही चांगली खेळी केली होती. फलंदाजांनंतर गोलंदाजीमध्येही भारताने कमाल केली. भारतासाठी अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली कामगिरी केली.


Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब