Ratnagiri : रत्नागिरीत ८ मार्चपासून पाच दिवसांचा कृषी महोत्सव

रत्नागिरी : येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ८ ते १२ मार्च असे पाच दिवस कृषी प्रदर्शन होणार आहे. यामध्येच पशु-पक्षी प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे. आत्मा, कृषी, बँकर्स, जिल्हा परिषद कृषी-पशुसंवर्धन, जिल्हा नियोजन अशा सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कृषी प्रदर्शन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सूचित वंजारे आदी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विद्यापीठ, बँकर्स, जिल्हा परिषद, कृषी विभाग, एनआरएलएम या सर्वांनी आपापले स्टॉल उभारून योजनांची माहिती द्यावी. शेतकरी, उत्पादक, महिला बचत गट यांच्यासाठी माहितीप्रदान परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावेत. ८ मार्च या महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम घ्यावेत. प्रदर्शनाच्या सुरुवातीला प्रवेशद्वारावर क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती प्रदर्शित करावी.


श्री. सदाफुले आणि श्री. बेतीवार यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.