Ratnagiri : रत्नागिरीत ८ मार्चपासून पाच दिवसांचा कृषी महोत्सव

रत्नागिरी : येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ८ ते १२ मार्च असे पाच दिवस कृषी प्रदर्शन होणार आहे. यामध्येच पशु-पक्षी प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे. आत्मा, कृषी, बँकर्स, जिल्हा परिषद कृषी-पशुसंवर्धन, जिल्हा नियोजन अशा सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कृषी प्रदर्शन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सूचित वंजारे आदी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विद्यापीठ, बँकर्स, जिल्हा परिषद, कृषी विभाग, एनआरएलएम या सर्वांनी आपापले स्टॉल उभारून योजनांची माहिती द्यावी. शेतकरी, उत्पादक, महिला बचत गट यांच्यासाठी माहितीप्रदान परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावेत. ८ मार्च या महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम घ्यावेत. प्रदर्शनाच्या सुरुवातीला प्रवेशद्वारावर क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती प्रदर्शित करावी.


श्री. सदाफुले आणि श्री. बेतीवार यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या