Mobile Bathroom : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार महिलांसाठी अनोखी बस!

मुंबई : महिलांसाठी आनंदाची बातमी. आता झोपडपट्टीतील महिलांना रस्त्यावर आंघोळ करावी लागणार नाही. या समस्येचं निरसन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या व्यवस्थेमुळे सुरक्षित, सुखकारक वातावरणात महिलांना आंघोळ करता येईल. यासाठी महापालिकेने फिरते स्नानगृह नावाची विशेष बस सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील कांदिवली परिसरात या बसचे उद्घाटन करण्यात आले आहे.



मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कांदिवली येथे महिलांसाठीच्या मोफत मोबाईल बाथरूम हाय टेक बसचे उद्घाटन करण्यात आले आहे. या बाथरूममध्ये महिलांना मोफत आंघोळ करण्यात येणार आहे. तसेच यामुळे पाण्याची बचत देखील होणार असल्याचे म्हटले जात आहे. जिल्हा नियोजन समिती आणि महानगरपालिकेने ही संकल्पना राबवली असून याचा फायदा गोरगरीबांना, झोपडपट्टीमध्ये तसेच रस्त्यावर राहणाऱ्या महिलांनाही होणार आहे. बसचे व्यवस्थापन तीन बहिणी करत आहे. या तिघी बहिणी 'बी द चेंज' नावाची संस्था चालवत आहे. शहाराच्या इतर भागातही अशा हायटेक मोफत मोबाईल बाथरूम आणण्याची तयारी सुरू आहे.



बसमध्ये कोणत्या सोयी उपलब्ध आहेत ?


बसमध्ये पाच बाथरूम आहेत. हँडवॉश, शॅम्पु, टब, बॉडी वॉश, टॉवेल, गीझर तसेच मोबाईल चार्जिंगची देखील सुविधा उपलब्ध आहे. या बसमध्ये कपडे सुकवण्यासाठी ड्रायर देखील आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ ते १० मिनिटे वेळ देण्यात येतील. बसमधील बाथरुमचे पाणी १० मिनिटानंतर आपोआप बंद होईल. बाथरुममधल्या टाकीची पाण्याची क्षमता २१०० लिटर इतकी आहे. बाथरुममध्ये बेसिन आणि इतर आवश्यक सुविधादेखील आहेत. महिलांकडून पालिकेच्या विशेष बससेवेचे स्वागत होत आहे.

Comments
Add Comment

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.