मुंबईतील २१ टक्के लोक मलवाहिन्यांच्या सेवा-सुविधांपासून वंचित

  246

मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विणण्यास महापालिकेला मर्यादा


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेने तब्बल ९ वर्षांपूर्वी मुंबई मलनिःसारण सुधारणा कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या कामांची प्रगती अत्यंत कासवगतीने सुरू आहे. गेल्या वर्षभरात टप्पा एकमधील ९३.६८ किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांपैकी केवळ ७७.५२ किमी लांबीच्या मलवाहिन्या टाकण्याचे काम होवू शकले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १४३.१९ किमी लांबीपैकी केवळ २३.८० किमी लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजही संपूर्ण मुंबईत मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विणण्यात महापालिका अपयश ठरत आहे. परिणामी आजही २१ टक्के लोकांना मलवाहिन्यांची सेवा सुविधा पुरवली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.


मुंबईच्या नागरिकांना १०० टक्के मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिकेला बंधनकारक आहे. सध्या २०७ किमी लांबीचे मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे कार्यान्वित असून त्या माध्यमातून मुंबईच्या एकूण ७९.४० टक्के लोकसंख्येला आणि ८५.४३ टक्के क्षेत्रफळाला मलनिस्सारण सुविधा पुरवली जात आहे. त्यानुसार, मुंबई मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) हा कार्यक्रम सन २०१६-१७ पासून हाती घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, टप्या एकमध्ये ९३.६८ किमीपैकी ७७.५२ किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच १२.५१ कि.मी लांबीची कामे प्रगतिपथावर असून ३. ६५ किमी लांबीच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, तर टप्पा दोनमध्ये अविकसित विकास रस्त्यांसह १४३.१९ किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्यांपैकी २३.२७ किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच ३४.२७ किमी लांबीची कामे प्रगतिपथावर आहेत.



२८५ किमी लांबीच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या व्यतिरिक्त ५.८७किमी लांबीची मलनिस्सारण वाहिनी बदलण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. आगामी वर्षांत सुमारे १६.१५ किमी लांबीची नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत. मागील वर्षाचा विचार केल्यास वर्षभरात मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ०.३० टक्केच क्षेत्रफळालाच मलनिस्सारण वाहिन्यांची सेवा पुरवता आली आहे. मागील वर्षी मुंबईच्या एकूण ८५.१५ टक्के क्षेत्रफळावर मलनिस्सारण सुविधा पुरवण्यात आली होती, तर आतापर्यंत ही टक्केवारी ८५.४३ टक्केच झाली आहे. तर मागील वर्षी ७७.८० टक्के लोकसंख्येला मलनिस्सारण सुविधा पुरवली गेली होती, ही टक्केवारी आता ७९.४० टक्के झाली आहे. त्यामुळे सुमारे दोन टक्केच लोकसंख्येला मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा देता आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.