BMC News : 'या' सहा हजार फेरीवाल्यांचे काय होणार?

सरकारच्या निर्देशानुसार अधिवास प्रमाणपत्र वगळता इतर कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरवले होते फेरीवाले


मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश देत अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टीफिकेट शिवाय फेरीवाला परवाना न आदेश दिल्यामुळे महापालिकेने यापूर्वी स्वीकारलेल्या धोरणाचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचा सर्वे केल्यानंतर त्यातील फेरीवाल्यांची पात्रता निश्चित करता अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. मात्र, त्यानंतर सरकारने ही अट टाकण्याच्या सूचना केल्याने मुंबईतील सुमारे सहा हजार फेरीवाले पात्र ठरले होते. परंतु अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार असल्याने पात्र ठरलेल्या सहा हजार फेरीवाल्यांची गिनती अपात्र फेरीवाल्यांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.



शहर फेरीवाला समितीच्या निवडणुक मतदानासाठी ९९ हजार फेरीवाल्यांना पात्र ठरवा, अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाल्यांच्या संघटनांनी न्यायालयात दाखल केली होती. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी महापालिकेने निकष ठरवले आहेत. त्यामुळे अन्य फेरीवाले, ज्यांकडे अधिवास प्रमाणपत्र नाही त्यांनाही महापालिकेने पात्र ठरवावे अशी मागणी ऍड गायत्री सिंह यांनी केले. त्यावर खंडपीठाने संतप्त होत ही मागणी मान्य केली जाणार नाही. बाकीचे मुद्दे नंतर ठरवले जातील. पण महाराष्टात रस्त्यावर जरी व्यवसाय करायचा असल्यास तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असायलाच हवे असे खंडपीठाने नमुद केले.



महापालिकेने सन २०१४मध्ये फेरीवाल्यांचा सर्वे करताना १ लाख २२ हजार फेरीवाल्यांना अर्ज वाटप केले होते, त्यातील सुमारे ९९ हजार फेरीवाल्यांनी अर्ज भरुन कागदपत्रांसह महापालिकेला दाखल केले. यात महापालिकेने सन २०१४ पूवीपासून फेरीवाला असणे, महापालिकेने कारवाई केल्याची पावती, अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार, त्यानुसार १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र ठरले होते, तर परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या १० हजार ३६० होती. मात्र, पुढे सरकारने अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य न धरण्याचे निर्देश दिल्याने याची अमलबजावणी केल्याने ६ हजार ६९४ फेरीवाले पात्र ठरले. त्यामुळे टाऊन वेंडींग कमिटीच्या निवडणुकीसाठी महापालिकेने ३२,४१५ फेरीवाल्यांची मतदार यादी ठरवली होती. परंतु न्यायालयाने अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे म्हटल्याने पात्र ठरलेले ६,६९४ फेरीवाले अपात्र ठरवले जाण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन पुढील कार्यवाही करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर