BMC News : 'या' सहा हजार फेरीवाल्यांचे काय होणार?

सरकारच्या निर्देशानुसार अधिवास प्रमाणपत्र वगळता इतर कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरवले होते फेरीवाले


मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश देत अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टीफिकेट शिवाय फेरीवाला परवाना न आदेश दिल्यामुळे महापालिकेने यापूर्वी स्वीकारलेल्या धोरणाचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचा सर्वे केल्यानंतर त्यातील फेरीवाल्यांची पात्रता निश्चित करता अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. मात्र, त्यानंतर सरकारने ही अट टाकण्याच्या सूचना केल्याने मुंबईतील सुमारे सहा हजार फेरीवाले पात्र ठरले होते. परंतु अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार असल्याने पात्र ठरलेल्या सहा हजार फेरीवाल्यांची गिनती अपात्र फेरीवाल्यांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.



शहर फेरीवाला समितीच्या निवडणुक मतदानासाठी ९९ हजार फेरीवाल्यांना पात्र ठरवा, अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाल्यांच्या संघटनांनी न्यायालयात दाखल केली होती. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी महापालिकेने निकष ठरवले आहेत. त्यामुळे अन्य फेरीवाले, ज्यांकडे अधिवास प्रमाणपत्र नाही त्यांनाही महापालिकेने पात्र ठरवावे अशी मागणी ऍड गायत्री सिंह यांनी केले. त्यावर खंडपीठाने संतप्त होत ही मागणी मान्य केली जाणार नाही. बाकीचे मुद्दे नंतर ठरवले जातील. पण महाराष्टात रस्त्यावर जरी व्यवसाय करायचा असल्यास तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असायलाच हवे असे खंडपीठाने नमुद केले.



महापालिकेने सन २०१४मध्ये फेरीवाल्यांचा सर्वे करताना १ लाख २२ हजार फेरीवाल्यांना अर्ज वाटप केले होते, त्यातील सुमारे ९९ हजार फेरीवाल्यांनी अर्ज भरुन कागदपत्रांसह महापालिकेला दाखल केले. यात महापालिकेने सन २०१४ पूवीपासून फेरीवाला असणे, महापालिकेने कारवाई केल्याची पावती, अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार, त्यानुसार १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र ठरले होते, तर परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या १० हजार ३६० होती. मात्र, पुढे सरकारने अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य न धरण्याचे निर्देश दिल्याने याची अमलबजावणी केल्याने ६ हजार ६९४ फेरीवाले पात्र ठरले. त्यामुळे टाऊन वेंडींग कमिटीच्या निवडणुकीसाठी महापालिकेने ३२,४१५ फेरीवाल्यांची मतदार यादी ठरवली होती. परंतु न्यायालयाने अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे म्हटल्याने पात्र ठरलेले ६,६९४ फेरीवाले अपात्र ठरवले जाण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन पुढील कार्यवाही करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Bhayander Illegal Mosque Demolished : मीरा-भाईंदरमध्ये मोठी कारवाई; अनधिकृत मशीद पाडली, परिसरात तणावपूर्ण शांतता

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील भाईंदर पूर्व येथील आझादनगर परिसरात आज सकाळी मोठी कारवाई करण्यात

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय

Suicide News : अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी; युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक

Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव बसचा कहर; ३ बाईक, टॅक्सी आणि ओला-उबेरला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन

MahaDBT Students Scheme : मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मिळणार; कोण पात्र? जाणून घ्या

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान