Kalyan : कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवाशांची लूटमार!

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूटमार होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे तिकीट विक्री करणारा कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून जादा पैसे उकळत होता. कर्मचाऱ्याचे हे प्रकरण इतर प्रवाशांना कळताच त्यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे.



नेमकं काय घडलं?


नालासोपारा इथे राहणारा धिरज विश्वकर्मा यांना कुंभमेळ्यानिमित्त प्रयागराज येथे जायचं होतं. प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढायचे असल्याने ते कल्याण रेल्वे स्थानकात गेले. तिथे गेले असता त्यांनी पाहिले की तिकीट खिडकीवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून जादा पैसे उकळत आहे. हा रेल्वे कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून ३० रुपये अतिरिक्तचे घेत होता. त्यावर, प्रवाशाने 'एका तिकिटामागे ३०-३० रुपये जास्त का घेत आहात? असा जाब विचारला असता, त्यावर कर्मचाऱ्याने आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव, असे म्हणत त्याचे ३० रुपये परत करतो. पण, त्याने अशा प्रकारे याआधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ३० रुपये अधिकचे वसूल केले होते. यावर कर्मचारी त्या प्रवाशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत बाजूला सरकण्यास सांगत चुकून झाल्याचे बोलत आहे.


दरम्यान, तिकीट विक्री कर्मचाऱ्याने प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडूनच केले की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही केली जात आहे.


Comments
Add Comment

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

फिल्म बनवण्याच्या नावाखाली डॉक्टरची कोट्यवधींची फसवणूक

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यावर उदयपूरमधील एका डॉक्टरकडून

नगरविकाससोबतची कांजूरमार्ग कचराभूमी बैठक निष्फळ

११ डिसेंबरच्या न्यायलयीन सुनावणीकडे लक्ष मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पावसाळा संपल्यापासूनच करणार सुरुवात

कचरा आणि माती स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर एक दिवस आड वाहने उभी करण्यास परवानगी नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ

रस्त्यांच्या कडेसह मोकळ्या जागांवर वृक्षरोपणावर अधिक भर

बांबूची झाडे अधिक प्रमाणात लावली जाणार महापालिका बनवणार बांबूच्या झाडांची नर्सरी मुंबई (विशेष