Kalyan : कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवाशांची लूटमार!

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूटमार होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे तिकीट विक्री करणारा कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून जादा पैसे उकळत होता. कर्मचाऱ्याचे हे प्रकरण इतर प्रवाशांना कळताच त्यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे.



नेमकं काय घडलं?


नालासोपारा इथे राहणारा धिरज विश्वकर्मा यांना कुंभमेळ्यानिमित्त प्रयागराज येथे जायचं होतं. प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढायचे असल्याने ते कल्याण रेल्वे स्थानकात गेले. तिथे गेले असता त्यांनी पाहिले की तिकीट खिडकीवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून जादा पैसे उकळत आहे. हा रेल्वे कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून ३० रुपये अतिरिक्तचे घेत होता. त्यावर, प्रवाशाने 'एका तिकिटामागे ३०-३० रुपये जास्त का घेत आहात? असा जाब विचारला असता, त्यावर कर्मचाऱ्याने आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव, असे म्हणत त्याचे ३० रुपये परत करतो. पण, त्याने अशा प्रकारे याआधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ३० रुपये अधिकचे वसूल केले होते. यावर कर्मचारी त्या प्रवाशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत बाजूला सरकण्यास सांगत चुकून झाल्याचे बोलत आहे.


दरम्यान, तिकीट विक्री कर्मचाऱ्याने प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडूनच केले की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही केली जात आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी