मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?

मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारा रस्ता सध्या सकाळी ७ ते रात्री १२ असा १७ तास वाहतुकीसाठी खुला असतो. हा रस्ता एप्रिल २०२५ पासून २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करत आहे. हा निर्णय घेण्याआधी सागरी किनारा मार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे देण्यात येणार आहे.



नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत किनारी रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ किमी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ ते जानेवारी २०२५पर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच मुंबईकर किंवा वाहनचालकांना फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याचीही कामे होत आहेत. कोस्टल रोड अर्थात किनारा रस्त्यावर वाहनांच्या वेगावर देखरेखीसाठी आठ ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या मार्गालगतच असलेल्या अमरसन येथे सुरक्षा यंत्रणेची नियंत्रण कक्ष इमारत उभारली जात आहे. दोन आंतरबदल मार्गिकांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. ही कामे पूर्ण होताच हा मार्ग वाहनचालकांसाठी २४ तास खुला करण्याबाबत विचार सुरू आहे.
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या