मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?

मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारा रस्ता सध्या सकाळी ७ ते रात्री १२ असा १७ तास वाहतुकीसाठी खुला असतो. हा रस्ता एप्रिल २०२५ पासून २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करत आहे. हा निर्णय घेण्याआधी सागरी किनारा मार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे देण्यात येणार आहे.



नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत किनारी रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ किमी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ ते जानेवारी २०२५पर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच मुंबईकर किंवा वाहनचालकांना फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याचीही कामे होत आहेत. कोस्टल रोड अर्थात किनारा रस्त्यावर वाहनांच्या वेगावर देखरेखीसाठी आठ ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या मार्गालगतच असलेल्या अमरसन येथे सुरक्षा यंत्रणेची नियंत्रण कक्ष इमारत उभारली जात आहे. दोन आंतरबदल मार्गिकांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. ही कामे पूर्ण होताच हा मार्ग वाहनचालकांसाठी २४ तास खुला करण्याबाबत विचार सुरू आहे.
Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास