मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?

मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारा रस्ता सध्या सकाळी ७ ते रात्री १२ असा १७ तास वाहतुकीसाठी खुला असतो. हा रस्ता एप्रिल २०२५ पासून २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करत आहे. हा निर्णय घेण्याआधी सागरी किनारा मार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे देण्यात येणार आहे.



नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत किनारी रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ किमी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ ते जानेवारी २०२५पर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच मुंबईकर किंवा वाहनचालकांना फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याचीही कामे होत आहेत. कोस्टल रोड अर्थात किनारा रस्त्यावर वाहनांच्या वेगावर देखरेखीसाठी आठ ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या मार्गालगतच असलेल्या अमरसन येथे सुरक्षा यंत्रणेची नियंत्रण कक्ष इमारत उभारली जात आहे. दोन आंतरबदल मार्गिकांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. ही कामे पूर्ण होताच हा मार्ग वाहनचालकांसाठी २४ तास खुला करण्याबाबत विचार सुरू आहे.
Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,