Delhi Election : ‘आप’च्या पराभवानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपद सोडले

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आमआदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आता रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री व आप नेत्या आतिशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेत सुपूर्द केला. आतिशी यांच्या राजीनाम्यानंतर सक्सेना यांनी विधानसभा बरखास्त केली आहे. आतिशी या जवळपास १४१ दिवस मुख्यमंत्रीपदावर होत्या.



अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. याआधी दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित या देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा पराभव करत भाजपाने २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता काबीज केली.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी