Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये आज रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि २ जखमी झाले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. (Chhattisgarh Encounter)



बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानंतर शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली.


मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूरच्या फरेसगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय उद्यान परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आज सकाळपासूनच ही चकमक सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी ६० जवानांसोबत चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Chhattisgarh Encounter)


या चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले असून आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यासध्या इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात शोध मोहीम राबवल्यावर ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,