Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

  110

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये आज रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि २ जखमी झाले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. (Chhattisgarh Encounter)



बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानंतर शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली.


मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूरच्या फरेसगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय उद्यान परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आज सकाळपासूनच ही चकमक सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी ६० जवानांसोबत चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Chhattisgarh Encounter)


या चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले असून आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यासध्या इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात शोध मोहीम राबवल्यावर ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे