Champion Trophy Song : जितो बाजी खेळ के! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे आयसीसीने केले रिलीज

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनी होणार आहे. यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असून ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशातच आता आयसीसीने स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. या गाण्याचं नाव जितो बाजी खेल के असं आहे. हे गाणे प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने गायले आहे. तसेच या गाण्याचे निर्माते अब्दुल्ला सिद्दिकी असून अदनान धुल आणि अस्फंदयार असद यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची झलक दिसत आहे, ज्यात रस्ते, बाजार, स्टेडियम यातून क्रिकेटबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अतिफ अस्लमचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.






 


यापूर्वी २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, त्यानंतर ही स्पर्धा गेली आठ वर्षे झाली नव्हती.ही स्पर्धा दोन आठवडे चालणार असून २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ८ संघात स्थान मिळवलेल्या संघात खेळली जाणार आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान १५ सामने या स्पर्धेत खेळले जाणार आहेत.या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे ४ संघ आहेत. तसेच ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे ४ संघ आहेत.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या