Champion Trophy Song : जितो बाजी खेळ के! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे आयसीसीने केले रिलीज

  77

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनी होणार आहे. यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असून ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशातच आता आयसीसीने स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. या गाण्याचं नाव जितो बाजी खेल के असं आहे. हे गाणे प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने गायले आहे. तसेच या गाण्याचे निर्माते अब्दुल्ला सिद्दिकी असून अदनान धुल आणि अस्फंदयार असद यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची झलक दिसत आहे, ज्यात रस्ते, बाजार, स्टेडियम यातून क्रिकेटबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अतिफ अस्लमचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.






 


यापूर्वी २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, त्यानंतर ही स्पर्धा गेली आठ वर्षे झाली नव्हती.ही स्पर्धा दोन आठवडे चालणार असून २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ८ संघात स्थान मिळवलेल्या संघात खेळली जाणार आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान १५ सामने या स्पर्धेत खेळले जाणार आहेत.या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे ४ संघ आहेत. तसेच ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे ४ संघ आहेत.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला