Champion Trophy Song : जितो बाजी खेळ के! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे आयसीसीने केले रिलीज

  90

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनी होणार आहे. यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असून ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशातच आता आयसीसीने स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. या गाण्याचं नाव जितो बाजी खेल के असं आहे. हे गाणे प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने गायले आहे. तसेच या गाण्याचे निर्माते अब्दुल्ला सिद्दिकी असून अदनान धुल आणि अस्फंदयार असद यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची झलक दिसत आहे, ज्यात रस्ते, बाजार, स्टेडियम यातून क्रिकेटबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अतिफ अस्लमचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.






 


यापूर्वी २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, त्यानंतर ही स्पर्धा गेली आठ वर्षे झाली नव्हती.ही स्पर्धा दोन आठवडे चालणार असून २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ८ संघात स्थान मिळवलेल्या संघात खेळली जाणार आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान १५ सामने या स्पर्धेत खेळले जाणार आहेत.या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे ४ संघ आहेत. तसेच ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे ४ संघ आहेत.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट