Nashik Viral Video : पालकांनो सावधान! वडिलांचा हलगर्जीपणा मुलाच्या जीवावर बेतला

नाशिक : सध्या सोशल मीडियावर रील बघणारे कोट्यवधी लोक आहेत. फावल्या वेळेत काम नसताना तरुणाई ते वृद्धांपर्यंतच जीवन रील मध्ये व्यग्र होत चाललं आहे. अगदी उठता, बसता, चालता फक्त रील एके रील. या रिलच्या नादात अनेकांनी आपले प्राण पणाला लावले आहे. अशीच एक नाशिक मध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वडिलांच्या निष्काळजीपणामुळे एका पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात चिमुकल्याने प्राण गमावले.



नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्कींगमध्ये ध्रुव अजित राजपूत ( वय ५ ) हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्याठी घेऊन आले होते. मात्र खेळून झाल्यानंतर घराकडे जात असताना अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते. तितक्यात ध्रुव वडिलांचा हात सोडून लॉबीमध्ये जाताना ईनोव्हा गाडीने त्याला चिरडलं. ध्रुवला गाडी दिसल्यानंतर त्याने थांबण्याचा प्रयत्न केला असता तो घसरुन गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला आणि चाक त्याच्या अंगावरुन गेलं.


 


 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)




मुलाच्या अंगावरुन कार गेल्याचं लक्षात आल्यानंतर अजित यांना धक्काच बसला. ते मुलाला उचलण्यासाठी पुढे धावले. काही क्षणांमध्ये घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली. ध्रुव बेशुद्ध झाल्यासारखा निपचित झाल्याने अजित चांगलेच संतापले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये इनोव्हाच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याचंही दिसत आहे. दरम्यान पालकांचा हलगर्जीपणा वाढला आहे का? यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील