मुंबई : उदय कोटक यांना कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक म्हणून अनेकजण ओळखतात. आता ते मुंबईतील फ्लॅट खरेदीमुळे चर्चेत आले आहेत. अब्जाधीश बँकर उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी संयुक्तपणे सुमारे २०२ कोटी रुपये खर्चून मुंबईत समुद्रकिनारी १२ आलीशान फ्लॅट खरेदी केले.
वरळी सी फेस परिसरात शिव सागर इमारतीत उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी संयुक्तपणे १२ आलीशान फ्लॅट खरेदी केले. खरेदी केलेल्या फ्लॅटची नियमानुसार रजिस्ट्रेशन फी आणि स्टँप ड्युटी भरुन नोंदणी करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या फ्लॅट खरेदीत कोटक कुटुंबाने दोन लाख ७० हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने व्यवहार केला आहे.
दक्षिण मुंबईतील वरळी सी फेस भागात उद्योगपती, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आयटी तज्ज्ञ अशा अनेक कोट्यधीश मुंबईकरांची घरं आहेत. यात आता कोटक कुटुंबाच्या १२ फ्लॅटची भर पडली आहे. कोटक कुटुंबाने केलेला सौदा हा मुंबईत झालेला सध्याच्या काळातला सर्वात मोठा घर खरेदीचा आर्थिक व्यवहार आहे.
शिव सागर इमारतीत कोटक कुटुंबाने ९ मे २०२४ रोजी ७३५ चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला. यानंतर परिसर आवडल्याचे कारण देत कोटक कुटुंबाने शिव सागर इमारतीत आणखी ११ फ्लॅटची खरेदी केली. या ११ फ्लॅटची नोंदणी ३० जानेवारी २०२५ रोजी झाली. कोटक कुटुंबाने तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला येथील एकूण १२ फ्लॅट खरेदी केले. या व्यवहाराद्वारे कोटक कुटुंबाने ७ हजार ४१८ चौरस फुटांचा परिसर २०१.८८ कोटी रुपये खर्चून खरेदी केला आहे. फ्लॅट उदय कोटक, त्यांची पत्नी पल्लवी, मुलगे धवल आणि जय तसेच वडील सुरेश यांच्या नावावर आहेत.
कोटक महिंद्रा ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. उदय कोटक यांचे आता बँकेत २६ टक्के शेअर्स आहेत. ते देशातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत नागरिक आहेत.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…